20 April 2024 3:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

शेतकऱ्यांची चेष्टा; फडणवीस सरकारकडून बॅटरीच्या प्रकाशात शेताचे दाखले व पीकाचा सर्वे

बीड : सध्या ग्रामीण महाराष्ट्रावर तीव्र दुष्काळाचे सावट आहे. त्यात सरकारने सध्या केवळ ‘दुष्काळ सदृश्य’ परिस्थिती असा उल्लेख केल्याने विरोधकांनी रोष व्यक्त केला असताना फडणवीस सरकारचा शेताचे दाखले आणि पीकाचा दिखाऊ सर्वे समोर येत आहे. कारण, सध्या महाराष्ट्र सरकारकडून दुष्काळी ग्रामीण भागाची पाहणी सुरु आहे. परंतु, धक्कादायक म्हणजे राज्य मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बीडमध्ये रात्रीच्या वेळेला चक्क बॅटरीच्या प्रकाशात पीक पाहणी केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. पुढे असेच दिखाऊ प्रकार आणि सर्वे अनेक भागात होऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काल म्हणजे शनिवारी रात्री उशिरा दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नित्रुड या गावात राज्यमंत्री संभाजी पाटील निलंगेकर गेले होते. दरम्यान, त्यावेळी गावाशेजारी विजेची सुविधा नसल्याने त्यांनी चक्क लहान बॅटरीच्या प्रकाशात शेताचे दाखले आणि पीकाचा सर्वे केला. दुसरं धक्कादायक म्हणजे हा संपूर्ण गावाचा सर्वे त्यांनी केवळ २० मिनिटांत पूर्ण केला, त्यामुळे फडणवीस सरकार सर्वेच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांची केवळ चेष्टा करत आहे का, अशी शंका शेतकरी उपस्थित करत आहेत.

दरम्यान, रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या प्रकाशात सर्वे केल्याने सरकार या विषयावर किती गंभीर आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे. दिवसा ढवळ्या सर्वे करून शेतकऱ्यांना नीट भरपाई मिळत नसताना आता रात्रीच्या अंधारात सरकारला काय नुकसान दिसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सरकारच्या या दिखाऊ सर्व्हमुळे दुष्काळात होरपळणारा शेतकरी अजूनच अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या विषयावर विरोधक काय भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x