दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मनसेचा औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा, नंतर राज्यव्यापी स्वरूप
मुंबई : महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागात मोठा दुष्काळ पडला आहे. परंतु, राज्यातील युती सरकार शेतक-यांच्या सर्व प्रश्नांकडे पूणर्पणे दुर्लक्ष करत आहे. त्यासाठी आता राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आणण्याची गरज असल्याने हातात दंडुका घ्यायला लागणार असल्याचा आक्रमक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या पत्रकार देण्यात आला आहे. फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २७ नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये प्रचंड मोठा दंडुका मोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर या मोर्चाला राज्यव्यापी स्वरूप येईल, अशी माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी प्रसार माध्यमांना दिली.
आज दुपारी राजगड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मनसे सरचिटणीस अनिल शिदोरे, नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे कसे दुर्लक्ष करत आहे, याची माहिती पत्रकारांना दिली. फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वी विविध तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती असल्याचे अधिकृतपणे जाहिर केले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी तालुक्यात केवळ दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहिर न करता थेट “दुष्काळ” जाहिर करावा अशी मागणी विरोधकांकडून होऊ लागली आहे.
दरम्यान, फडणवीस सरकारने दुष्काळसदृश्य परिस्थिती जरी जाहिर केली असली तरी त्यावर कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप मनसेने आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. राज्यातील अनेक भागात दुष्काळ जाहिर करून सुद्धा फडणवीस सरकारकडून योग्य उपाययोजना राबवल्या जात नसल्याने बळीराजा अजून संकटात ढकलला जात असून, त्यांच्यामध्ये सरकार विरोधात संतापाची लाट आहे असं मनसेने निदर्शनास आणून दिले आहे.
तसेच दुष्काळ परिस्थितीची कोणतीच माहिती सध्या सरकारकडे नाही. खरीप हंगाम असतानाच सर्व गोष्टींची कल्पना राज्य सरकारने शेतकऱ्यांना देणे गरजेचे होते. परंतु, राज्य फडणवीस सरकार याची कोणतीही माहिती देत नसल्याची खरमरीत टिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रकार परिषदेत केली आहे. आणि त्यासाठीच झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी २७ नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा काढण्यात येईल. तसेच त्यानंतर पक्षातर्फे राज्यव्यापी मोर्चे काढले जातील. दरम्यान, ज्या तालुक्यात शेतक-यांना दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशा तालुक्यात मनसेकडून भव्य मोर्चे काढण्यात येतील असे सावंत यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
- KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल
- Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल