29 March 2024 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर
x

शिवसेना व विहिंप नेत्यांना श्रीरामापेक्षा राजकारणात अधिक रस: महंत नरेंद्र गिरी

अयोध्या : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि या विषयाला अनुसरून आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी शिवसेना नेत्यांना आणि उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला आहे. ‘या नेत्यांना प्रभू रामापेक्षा केवळ राजकारणात अधिक रस आहे’, अशा शब्दात खडे बोल सुनावले आहेत.

सध्या उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे हे नेते अयोध्येत दौरे करत आहेत. परंतु, शिवसेनेच्या या दौऱ्यानिमित्त आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिवसेना आणि शिवसनेच्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणाले, “या नेत्यांना प्रभू रामापेक्षा राजकारणातच अधिक रस आहे. या दोन्ही संघटना (म्हणजे शिवसेना आणि विश्व हिंदू परिषद) स्वत:चा प्रचार तसेच केवळ राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करत आहेत”, असा थेट आरोप केला.

विहिंप तर्फे सुद्धा २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जर हिंदुत्ववादी संघटना तसेच राजकीय पक्षांचा मंदिर निर्माण करणे हा खरंच मुख्य हेतू असता, तर त्यांनी स्वतःचे जाहीर आणि स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजीत केले असते का?. या दोन्ही संघटनांच्या अशा जाहीर कार्यक्रमातून मंदिर बांधण्याचा तोडगा निघणार नाही, असा स्पष्ट दावा सुद्धा त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला. तसेच आखाड्याशी संबंधित साधू- संत शिवसेना आणि विहिंप’च्या जाहीर कार्यक्रमात अजिबात सहभागी होणार नाहीत, हे सुद्धा स्पष्ट केले.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x