25 April 2024 6:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

देश कठीण परिस्थितीतून जातो आहे: प्रणब मुखर्जी

नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी यांनी मानवाधिकारांचे हनन आणि देशांतर्गत वाढती असहिष्णूता आणि देशातील जास्तीत जास्त पैसा केवळ श्रीमंतांच्याच खिशात जात असल्याने भारतात गरीब-श्रीमंतांमध्ये निर्माण झालेल्या दरी मुळे त्यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.

प्रणब मुखर्जी फाऊंडेशनद्वारे आयोजित एका संमेलनात त्यांनी जाहीरपणे त्यांचं मनोगत उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, “देश सध्या एका अत्यंत अवघड परिस्थितीमधून जात आहे. ज्या भूमीने वसुधैव कुटुंबकम तसेच सहिष्णूतेचे धडे विश्वाला दिले आहेत. तीच भूमी आज असहिष्णुतेत, एकूणच मानवाधिकारांचे उल्लंघन आणि दंगलींमुळे जगभर चर्चेत आली आहे. सध्या देशातील सरकारी संस्थांवरचा सामान्य जनतेचा विश्वास उडाला आहे. तसेच या संस्थांच्या कामकाजाबाबत आणि कार्यपद्धतीमुळे एक संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जेव्हा एखादा देश बंधुभाव तसेच सहिष्णुतेचे स्वागत करते तेव्हा तो देशांतर्गत विविध समाजाच्या सद्भावनेला प्रोत्साहित करतो. जेव्हा आपण एकमेकांबद्दलच्या द्वेषाला दूर करतो आणि आपल्या रोजच्या जीवनातील ईर्ष्या तसेच आक्रमकता दूर करतो तेव्हा तिथे आपणहून शांती आणि बंधुभाव निर्माण होतो. सर्वात उत्तम वातावरण अशा देशांत असते जो देश आपल्या सामान्य नागरिकांना त्यांना हव्या असलेल्या मुलभूत सोयी-सुविधा पुरवतो. तसेच त्यांना सुरक्षा आणि स्वायत्तता प्रदान करतो असं प्रणव मुखर्जी म्हणाले.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x