29 March 2024 8:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

मला नेहरुंचं ‘ते’ भाषण खूप आवडतं : नितीन गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते नितिन गडकरी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणाचा दाखला देत, त्यातून मांडण्यात आलेल्या विचाराचे प्रामाणिकपणे कौतुक केले आहे. एका कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, उपस्थितांशी संवाद साधताना गडकरी म्हणाले की, ‘पंडित जवाहरलाल नेहरु म्हणायचे भारत हा देश नाही, लोकसंख्या आहे. या देशाचा प्रत्येक व्यक्ती या देशासाठी एक प्रश्न आहे, समस्या आहे. त्यांचं हे भाषण मला अत्यंत आवडतं. त्यांमुळे मी इतकं जरुर करु शकतो की, देशासमोर मी स्वतः समस्या बनून राहणार नाही.

यावेळी गुप्तचर विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित करताना गडकरी कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले, ‘सहिष्णुता भारताची सर्वांत मोठी देणं असून ही आपल्या व्यवस्थेचा एक मोठा भाग आहे. त्यामुळे जर एखाद्याने चुकीचं केलं तर आपण सुद्धा त्याला तशीच प्रतिक्रया द्यायची ही मानसिकता अजिबात ठीक नाही. पंडित नेहरुंनी म्हटले होते की, ‘भारत एक देश नाही तर लोकसंख्या आहे. जर आपण एखाद्या समस्येवर तोडगा काढण्यास सक्षम नसल्यास किमान आपण या समस्येचा भागही बनता कामा नये, हे नेहरुंच भाषण मला अत्यंत आवडतं, असं सुद्धा गडकरी यावेळी म्हणाले.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, ‘विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट आहे. आपण सर्वांसी विनम्रतेने बोलता, चांगले बोलता. हे सर्वांना आकर्षित करु शकते परंतु, यामुळे आपण देशातील निवडणुका जिंकू शकत नाही. तुम्ही विद्वान असू शकता, परंतु हे जरुरी नाही की लोकांनी तुम्हाला मतं दिली पाहिजेत. ज्यांना असं वाटतं की त्यांना सगळ कळतं तर त्यांचा हा समज अत्यंत चुकीचा आहे. आत्मविश्वास आणि अहंकार या दोन्हीमध्ये फार अंतर आहे. आपल्याला आत्मविश्वासू असायला हवा, परंतु अहंकारा पासून सुद्धा वाचायला हवं.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x