29 March 2024 3:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

गंगा नदी ICU मध्ये, मोदींनी नदीच्या शुद्धीकरणाचे वचन पूर्ण केले नाही: वॉटरमॅन राजेंद्र सिंह

कोलकत्ता : गंगा नदीच्या शुद्धीकरणावरुन जागतिक ख्यातीचा रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते आणि विख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मोदींनी गंगा शुद्धीकरणासंदर्भात दिलेले आश्वासन त्यांनी पाळलं नाही. कारण गंगा नदीचे पाणी अत्यंत दुषित झाले आहे’, अशी व्यथा त्यांनी मांडली आहे.

दरम्यान, राजेंद्र सिंह हे गंगा सद्भावना यात्रेनिमित्त कोलकात्यात असून बुधवारी त्यांनी कोलकात्यात आयोजित पत्रकार परिषदेत मुक्त संवाद साधला. त्यावेळी गंगा नदीच्या वादावर ते म्हणाले, मोदींच्या सत्ताकाळात केवळ भांडवलशाहीवर आधारित लोकशाही उरली आहे. त्यामुळे लोकांना नदीत निर्माल्य टाकल्यास अटक तर होते, परंतु स्थानिक उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात गंगा नदीत दुषित आणि रसायनयुक्त सांडपाणी मोठ्याप्रमाणावर सोडले जाते. परंतु, हे सर्व खुलेआम होत असताना संबंधित कंपन्यांवर कोणतीही कारवाई प्रशासनाकडून होत नाही, असे त्यांनी मुख्यत्वे नमूद केले.

गंगा नदी सद्य ICU मध्ये असून ‘नमामी गंगे’ या योजनेमुळे नदीचे अजिबात शुद्धीकरण होऊ शकलेले नाही. तसेच या योजनेअंतर्गत केवळ गंगा घाटांचा पुनर्विकास करण्यात आला. परंतु, गंगा नदीचे शुद्धीकरण हे अजून सुद्धा केवळ स्वप्नच आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. आधी मोदींनी गंगा नदी माते समान असल्याचे सांगितले. त्यांनतर ३ महिन्यात गंगा नदीचे शुद्धीकरण सुरु करण्याचे आश्वासन सुद्धा दिले. परंतु अजून सुद्धा त्यांनी त्यासाठी ठोस असं काहीच केले नाही. त्यामुळे गंगा नदीची अवस्था सध्या अत्यंत दयनीय आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता गंगानदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी मोदी सरकार पुन्हा काही नाही निवडणुकीची घोषणा करणार का हेच पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x