28 March 2024 5:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

आमच्या सरकारमुळे उत्तर भारतीयांना धमकावण्याचे प्रकार बंद: फडणवीस

मुंबई : युपी ही जन्मभूमी असलेल्या प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या वनवासातील चौदा वर्षे नाशिकच्या पंचवटीत व्यतीत केली. त्यामुळे यूपी आणि महाराष्ट्राचे हजारो वर्षांचे ऋणानुबंध आहेत. तसेच राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या विकासात उत्तर भारतीय समाजाचे मोठे योगदान आहे. यापूर्वीच्या सरकारच्या काळात उत्तर भारतीयांना धमकावण्याचे प्रकार वारंवार घडत. मात्र, मागील साडेचार वर्षे आमच्या सरकारच्या कामगिरीमुळे त्यांना कोणी सुद्धा धमकावले नाही, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात केला.

मुंबईतील सांताक्रुझ येथे ‘उत्तर भारतीय स्थापना दिन’ मेळाव्यात काल मुख्यमंत्री उपस्थितांना संबोधित करत होते. दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह युपीचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा उपस्थित होते. मागील ३१ वर्षांपासून उत्तर प्रदेश दिन आयोजित करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे मुंबई सरचिटणीस अमरजीत मिश्र यांचे फडणवीसांनी यावेळी तोंडभरून कौतुक केले. या वेळी उत्तर भारतीय नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती.

तसेच आज सकाळीच लखनऊ येथे उत्तर भारतीय स्थापना दिवस साजरा केला. आता सायंकाळी आम्ही उत्तर भारतीय स्थापना दिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आल्याचे आदित्यनाथ योगी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x