मुंबईसह राज्यात हाई अलर्ट, दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात
पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर भारत – पाकिस्तान तणाव आणखीनच वाढला आहे. काश्मीरमध्ये सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून जम्मू, श्रीनगर, पठाणकोट येथे विमानतळांवरून प्रवासी वाहतुक बंद करण्यात आली आहे आहि हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर संस्थांनी सर्वाधिक धोका मुंबईला असल्याचे म्हटले जात आहे. दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात. त्यामुळे राज्यातही हाय अलर्ट जारी केला आहे.
सार्वजनिक वाहतूक किंवा सार्वजनिक स्थळांना सर्वात जास्त धोका जारी केला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या मते बसेस, रेल्वे आणि गर्दीची ठिकाणं दहशदवाद्यांकडून टार्गेट केली जाऊ शकतात. अर्थातच याची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र पोलीस सतर्क आहेत आणि संभावित ठिकाणी गस्त वाढवली आहे. परंतु आपली नैतिक जिम्मेदारी म्हणून प्रत्येक नागरिकाने सतर्क राहावे आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या संशयित हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी.
भारत सरकारने काल हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेसाठी परराष्ट्र सचिवांना पुढे करून आम्ही हे एअर स्ट्राईक केले असून आम्ही फक्त दहशतवादी तळाला टार्गेट केलं आहे. आमच्या हल्ल्यात कोणत्याही सामान्य पाकिस्तानी नागरीक किंवा सैनिकाला आम्ही इजा केली नाही. जागतिक कायद्यानुसार कलम ३५A नुसार आम्ही आमच्या देशाच्या आत्मरक्षणासाठी हे पाऊल उचलले आहे. या कॅम्पमध्ये ४२ दहशतवादी आत्मघातकी प्रशिक्षण घेत होते आणि त्यांच्याकडून आमच्या देशाला धोका होता म्हणून आम्ही हे स्ट्राईक केले.
भारताची हि नीती उत्तम होती आणि अमेरिकेने देखील याचे समर्थन केले. परंतु पाकिस्तानने आपल्यावर हलला केला तर त्यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत याचे उत्तर द्यावे लागेल आणि त्याचे उत्तर त्यांच्याकडे नक्कीच नसेल. म्हणूनच पाकिस्तान दहशदवाद्यांचा वापर करून जास्तीत जास्त हल्ले भारताच्या अंतरिम भागात करू शकतो. म्हणजे बसेस, रेल्वे, सार्वजनिक ठिकाणं, गर्दीची ठिकाणं टार्गेट होऊ शकतात.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
- Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली
- Numerology Horoscope | 15 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा