25 April 2024 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा? Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील
x

टोलवाटोलवीनंतर मुंबई महापालिकेची कबुली, त्या पुलाची जबाबदारी आमची होती

BJP maharashtra, shivsena, mns, uddhav thackeray, devendra fadnavis, bmc, bridge accident, csmt, cst

महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत ६ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटने नंतर शिवसेना प्रणित मुंबई महानगर पालिका आणि रेल्वे मध्ये चांगलीच टोलवाटोलवी रंगली. सुरुवातीला तर दोघांनीही एकमेकांकडे बोट दाखवत आपली जबाबदारी सपशेल झटकली.

स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी या दुर्घटनेसाठी रेल्वे जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. लोअर परळचा ब्रिज कोसळला त्यानंतर सगळ्या पुलाचं ऑडिट झालं होतं मात्र, या पुलाचं ऑडिट झालेलं नव्हतं. याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वेची आहे. यासंबंधी आधीचे नगरसेवक गणेश सानप यांनी रेल्वे प्रशासनाशी याप्रकरणी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तरीही यावर अद्याप काहीही कर्यवाही करण्यात आलेली नाही असं सुजाता सानप यांनी सांगितलं होतं.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीदेखील पुलाची जबाबदारी रेल्वेची असल्याचं सांगितल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर रेल्वे प्रशासनाने हा पूल महापालिकेच्या अख्त्यारित येत असून आम्ही सहकार्य करत असल्याचं सांगितलं होतं. पण महापालिका अधिकाऱ्यांना रात्री उशिरा या पुलाची जबाबदारी महापालिकेची होती स्पष्ट केल्याने संभ्रम दूर झाला आहे.

२५ वर्ष सत्तेत असलेली शिवसेना सामान्य मुंबईकरांच्या जीवावर उठली आहे काय? असा सवाल सामान्य मुंबईकर करत आहेत. कोणतीही घटना घडली कि त्याची जबाबदारी झटकायची आणि गोंधळ निर्माण करायचा. जर मुंबई महानगर पालिकेच्या अधिकारात हा पूल येत होता तर याची योग्य ती देखभाल का नाही केली गेली? सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे शिवसेना – भाजप अशा घटनांवर तू तू मै मै करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात आणि सत्तेत मात्र सोबत मलाई चाखतात असा काहीसा विरोधाचा सूर आज सामान्य मुंबईकरांनी लावलेला आढळला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x