18 April 2024 2:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरने 3 वर्षात दिला 358% परतावा, आता सकारात्मक बातमी आली IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मालामाल होण्याची संधी, मजबूत फायदा होईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करतोय, खरेदीला गर्दी Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
x

ना भेट, ना शब्द, उद्धव ठाकरे किती असंवेदनशील आहेत ते आज मुंबईकरांनी पाहिलं

Shivsena, BJP Maharashtra, uddhav thackeray, aditya thackeray, vishwanath mahadeshwar, bmc, csmt, cst

मुंबई : मुंबई महापालिका ते दिल्लीत खुर्च्या उबवणाऱ्या शिवसेना नेत्यांची तसेच उद्धव ठाकरे यांची मुंबई शहर आणि मुंबईकरांप्रती असलेली असंवेदनशीलता आज अधोरेखित झाली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल येथील पादचारी पूल काल रात्री कोसळून अनेकजण मृत्युमुखी पडले आणि जखमी देखील झाले. परंतु, मुंबई महापालिकेत सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी चकार शब्द देखील काढला नाही, ना जागेची पाहणी केली, ना मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, ना जखमी झालेल्यांची विचारपूस केली.

मुंबईमध्ये राहणाऱ्या उद्धव ठाकरेंकडे त्यासाठी वेळ नसला तरी ते स्वबळावर अमरावतीला जाऊन भाजप-सेनेच्या एकत्र युती मेळाव्यात मोठं मोठी फुसकी भाषणबाजी करून आले. मुंबई महापालिकेत मलिदा मिळण्याचं साधन असलेल्या स्थायी समितीतील नियुक्त्यांच्या वेळी उद्धव ठाकरे जसे जागृत दिसतात, तसे कालच्या दुर्घटनेनंतर दिसले नाहीत. मुंबई शहरात वेगळ्याच गंभीर समस्या उद्भवलेल्या असताना उद्धव ठाकरे मात्र अमरावतीत तेच नेहमीचं हिंदू, भगवा आणि लोकांसाठी युती केल्याची फुसकी आणि कंटाळवाणी भाषणं ठोकत होते.

उद्धव ठाकरे सध्या लोकसभेच्या जागा आणि वाटण्या यामध्ये इतके बुडाले आहेत कि सध्या त्यांना काहीच दिसत नाही किंवा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकरण सत्ताधारी शिवसेनेवर शेकू नये म्हणून आंधळे पानाचं नाटक करत आहेत, असंच म्हणावं लागेल. ५ वर्ष भाजप विरुद्ध रटाळ आणि फुसकी भाषणबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरेंची सध्या लोकसभेच्या निमित्ताने आणि सत्तेच्या हव्यासापोटी भाजपसोबत सुरु झालेली साखर पेरणी त्यांची विश्वासाहर्ता संपुष्टात आणत आहे याच त्यांना अजिबात भान नसल्याचं सध्याचं वातावरण सांगत आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x