24 April 2024 1:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

भाजपचं डोकं ठिकाणावर आहे का? पूल दुर्घटनेसाठी मुंबईकर पादचारी जबाबदार, भाजपा नेत्याचं अजब वक्तव्य

BJP, BJP maharashtra, shivsena, sanju varma, devendra fadnavis, vinod tawade, bmc, csmt, cst

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील काल झालेल्या पूल दुर्घटनेत ६ लोकांनी आपला जीव गमावला तर ३० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसहित अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. सामान्य मुंबईकर हा नेहमीच भरडला जातो आणि मुंबई स्पिरिट च्या नावाखाली राजकारणी मुंबईकरांना फक्त आणि फक्त मूर्ख बनवत आले आहेत.

तसंच काहीसं आज घडलं आहे, भाजपच्या प्रवक्त्या संजू वर्मा यांनी पूल दुर्घटनेसाठी थेट मुंबईकर पादचाऱ्यांनाच जबाबदार ठरवलं आहे. टाइम्स नाऊशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. संजू वर्मा यांनी ही दुर्घटना नैसर्गिक असल्याचं सांगितलं. सोबतच सरकारचं याच्याशी काही घेणं देणं नसल्याचं सांगत हाट झटकण्याचा प्रयत्न केला आणि पादचारीच दुर्घटनेला जबाबदार असल्याचं म्हटलं. संजू वर्मा यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे.

अशा असंवेदनशील प्रतिक्रियांमुळे मुंबईकर हा मूर्ख आहे आणि त्याला स्पिरिट च्या नावाखाली आपण सहानुभूती दिली कि तो दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा आपला जीव मुठीत घेऊन जगायला मोकळा, असं काहीसं राजकारण्यांचं मत झालं असावं. पण मुंबईकरांमध्ये स्पिरिट तर आहेच परंतु रोजच्या कमाईवर हातावर पोट घेऊन जगणारा मुंबईकर जर १ दिवस कमला गेला नाही तर त्याच्या घराची चूल पेटणार नाही हे त्याला माहित असून कोणत्याही परिस्थितीत अगदी बॉम्ब ब्लास्ट झाला तरी सुद्धा मुंबईकर दुसऱ्या दिवशी आपल्या नियमित कामाला लागतो आणि ती त्याची मजबूरी आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x