29 March 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मंत्रिपद मिळालं, 'लाव रे फटाके'! भाजपासाठी आठवले व उद्धव ठाकरेंची राजकीय किंमत एकच?

Ramdas Athavale, Shivsena, BJP, RPI, Udhav Thackeray

नवी दिल्ली : कालच नवी दिल्लीत मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि त्यात अनेक पक्षातील खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यात भाजप सरकार बहुमताने सत्तेत आल्यामुळे एनडीएच्या घटक पक्षांचे चोचले पुरवले जाणार नाहीत हे त्या घटक पक्षांना आधीच ठाऊक असावं. त्यात मागील ५ वर्ष सत्तेला लाथ मारणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे गोडवे गाताना दिसत आहेत, मात्र त्यांच्याकडे १८ खासदार असले तरी ते मोदींच्या नावावरच निवडून आले आहेत, हे सत्य असलं तरी ते मान्य करणार नाहीत हे वास्तव आहे. अर्थात शिवसेनेचा संपूर्ण प्रचार हा मोदींच्या नावावर झाला, त्यात गरजेप्रमाणे स्वर्गीय. बाळासाहेबांना देखील लक्षात ठेवण्याचा त्रास यांच्या स्टार प्रचारकांनी घेतला नाही हे सर्वांनी डोळ्याने पहिले आहे.

मात्र संपूर्ण देशात एकही खासदार नसताना आरपीआयचे रामदास आठवले यांना एक मंत्रिपद यावेळी देखील निश्चितपणे मिळालं आहे. परंतु दुसऱ्याबाजूला १८ खासदार मिळाल्याच्या आनंदात ‘लाव रे फटाके’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देखील एकाच मंत्रिपद मिळालं आहे. त्यात ठरल्याप्रमाणे ते अवजड उद्योग मंत्रालयच असेल तर अजूनच अवघड आहे, ज्या खात्याचा सामान्यांसाठी काहीच उपयोग नाही. अगदी झालाच तर तर मुंबई आणि आसपासच्या अनेक भागात याच मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारे प्लॉट अनधिकृत वस्त्यांच्या नावाखाली बळकावले आहेत तेथे काही हाती लागण्याची अधिक शक्यता आहे.

मात्र भाजपकडून आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकाच तराजूत तोललं जात आहे हे वास्तव आहे. त्यामुळे रामदास आठवले जसे केवळ भाजप आणि मोदींचे गुणगान गातात तीच वेळ आज उद्धव ठाकरेंची झाली आहे हे वास्तव आहे. त्यामुळे मागील ५ वर्ष भाजप, मोदी आणि अमित शहांवर खालच्या थराला जाऊन टीका करणारे उद्धव ठाकरे सध्या याच नेत्यांवर रामदास आठवले यांच्याप्रमाणे कविता लिहिण्याचेच शिल्लक आहे असंच म्हणावं लागेल.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x