28 March 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

वायएस जगनमोहन रेड्डींच्या मंत्रिमंडळात ५ जातीचे ५ उपमुख्यमंत्री

YS jaganmohan, Chandrababu naidu

अमरावती : आंध्र प्रदेश सरकारमध्ये केवळ १-२ नव्हे, तर तब्बल ५ उपमुख्यमंत्री असणार आहेत. आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. घटनेनुसार उपमुख्यमंत्री या पदाला कोणताही संविधानिक अधिकार नसतो, मात्र स्वतःच्या पक्षातील इतर वजनदार नेते मंडळींना खुश करण्यासाठी हे पद निर्माण गेलं असलं तरी त्याचा वेगळाच प्रयोग सध्या आंध्र प्रदेशच्या राजकारणात केला जात आहे.

याच पदाला आता जातीचा आधार देऊन पक्षातील विविध जातीच्या नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल केलं जाणार आहे. त्यात जातीय राजकारणाचा विचार करता एससी, एसटी, बीसी, अल्पसंख्यांक आणि कापू अशा एकूण ५ समाजातील नेतेमंडळींना उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार आहे. त्यामुळे एकप्रकारे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या पुढील म्हणजे २०२४ मधील विधानसभा निवडणुकीची बीज रोवल्याचे म्हटले जात आहे.

त्यामुळे संपूर्ण देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्यात तब्बल ५ उपमुख्यमंत्री असतील. चंद्राबाबू नायुडू यांच्या सरकारमध्ये बीसी आणि कापू अशा २ समाजातील उपमुख्यमंत्री होते. वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारमधील २५ मंत्री येत्या शनिवारी शपथग्रहण करतील. नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत वायएस जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, अडीच वर्षांनी मंत्रिमंडळाची फेररचना सुद्धा केली जाईल. प्रत्येक आमदाराने आपले काम चोख करावं, प्रत्येक नागरिकाच्या समस्येकडे गांभिर्याने पाहावं. कारण सर्वांची नजर आपल्या कामगिरीकडे आहे. आपल्या वायएसआर काँग्रेसचं सरकार आणि आधीचं चंद्राबाबूंचं सरकार यातील फरक लोकांना दाखवून द्यायला हवं.” असेही वायएस जगनमोहन रेड्डी म्हणाले.

हॅशटॅग्स

#Chandra Babu Naidu(15)#YSR Congress(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x