20 April 2024 4:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

ते स्वतःच निवडून येण्याची शास्वती नाही; त्यांच्या भरोसे स्वबळावर ही राजकीय आत्महत्या?

Ashok Chavan, Pruthviraj Chavan, Hussain Dalwai, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रापासून ते संपूर्ण देशभर सपाटून मार खाल्ल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी जोरदार बैठका सुरु आहेत. त्यात आगामी विधानसभा निवडणुक राष्ट्रवादीला वगळून स्वबळावर किंवा वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन लढवावी अशी मागणी पुढे आली आहे. मात्र काँग्रेसकडे आजच्या घडीला राज्य पातळीवरील चेहराच शिल्लक नसल्याने ते असं धाडस नेमकं कोणत्या आधारावर करत आहेत ते समजायला मार्ग नाही.

काँग्रेसचा पारंपरिक मतदार देखील त्यांच्याकडे राहिलेला नसल्याने असे निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्याच म्हणावी लागेल. त्यात राहुल गांधी विधानसभेत उतरल्यास अजूनच नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, तर दुसरीकडे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण किंवा राज्यातील इतर कोणत्याही नेत्याच्या सभांना शंभर लोकं जमतील याची देखील शाश्वती देता येणार नाही. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीलासोबत घेऊन जाणे म्हणजे स्वतःच भविष्यातील उरलं सूरलं अस्तित्व सुद्धा धोक्यात आणण्यासारखं आहे. राज्यातील आज काँग्रेसचे सर्वच दिग्गज नेते पराभूत झाल्याने ते कोणत्या तोंडाने दुसऱ्याला निवडून आणण्याची धमक दाखवतील असा प्रश्न उरतो. त्यात स्वतःच्या हिमतीवर निवडून येऊ शकतील असे विद्यमान आमदार स्वतःच वैयक्तिक राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी पुन्हा भाजपच्या गळाला लागतील यात अजिबात शंका नाही.

आजच्या घडीला विधानसभा निवडणुकीचा विचार करता भाजप-शिवसेनेनंतर राज्यात निवडणुकीदरम्यान मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचाच दबदबा राहील असं सध्याचं राजकीय चित्र आहे. त्यात लोकसभेत आधीच सगळं बळ संपुष्टात आल्यानंतर पुन्हा स्वबळाचा नारा म्हणजे केवळ राजकीय आत्महत्याच म्हणावी लागेल. आधीच काँग्रेसच्या जहाजात कोणीही बसण्यास तयार नाही आणि काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतल्यास, राष्ट्रवादी थेट मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप आणि इतर छोट्या पक्षांना एकत्र घेऊन वेगळीच आघाडी निर्माण करतील आणि काँग्रेसची अवस्था अजूनच भीषण होईल असं राजकीय विश्लेषक मत व्यक्त करत आहेत.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x