20 April 2024 8:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

५ वर्ष संपली, विधानसभा आल्या; आता मुख्यमंत्र्यांकडून मराठवाडा दुष्काळमुक्तीची भाषा

Devendra Fadanvis, Marathawada, Drought

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभा दौरे सुरु झाले आहेत असंच म्हणावं लागेल. कारण सत्तेचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून आणि ३-४ महिन्यांवर विधानसभा निवडणूक आल्याने त्यांच्याकडून पुन्हा मतदाराला आणि विशेष करून दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या मराठवाड्याला पुन्हा मृगजळ दाखविण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत, त्यावेळी ते म्हणाले ‘सध्याच्या पिढीने मराठवाड्यात बाराही महिने दुष्काळचं पाहिला आहे, परंतु आता पुढच्या पिढीला मराठवाड्यातील दुष्काळ पाहू देणार नाही, हा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करु. त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला. औरंगाबादमधील दुष्काळाची आणि गंगापूरच्या फाईव्ह स्टार चारा छावणीची पाहणी केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात जलयुक्त शिवारची कामं झाली नसती तर आत्तापेक्षा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला असता. जलयुक्तमुळे विहिरींना पाणी राहिलं त्यामुळे ग्रामीण भागात टँकरवीना बराच काळ पाणी पुरु शकलं. शेतीची उत्पादकताही वाढली. कमी पावसातही मोठं नुकसान झालं नाही, हे जलयुक्त शिवारचं यश आहे. दुष्काळापासून कायमची सुटका मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी राज्याला ४ हजार कोटींची मदत केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी ११ प्रमुख धरणांची एक ग्रीड आम्ही तयार करतोय त्यांना पाईपने जोडण्याची योजना आहे. पाईपच्या माध्यमातूनच पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी पोहोचवायचे आहे. याचे दोन महिन्यांत टेंडरही काढण्यात येईल. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणता येईल, तसे झाले तर १०० टीएमसी पाणी आपण आणू शकतो त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली दुष्काळमुक्तीची भुमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, दुष्काळमुक्तीची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘स्वच्छ भारत’प्रमाणे पाण्यासाठी नवीन अभियान हाती घेतलंय, ते म्हणजे ‘जलशक्ती अभियान’. त्यासाठी नवीन मंत्रालयही स्थापन करण्यात आलं आहे. या माध्यमातून केंद्र सरकारकडून प्रत्येक गावाला, शेतीला पाणी पोहोचवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.

वास्तविक जलयुक्त शिवारांचं वास्तव मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे आणि सरकारने बांधलेल्या लाखो विहिरींचा अजून सरकारलाच शोध लागलेला नाही. त्यात मराठवाडा हा भविष्यात वाळवंट होण्याच्या दिशेने प्रवास करत आहे आणि त्यामुळे सरकारच्या वरवरच्या उपायांना मराठवाडा दुष्काळमुक्त होणार नाही हे वास्तव आहे. मात्र विधानसभा निवडणुका जवळ आल्याने मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा वर्तमान काळाकडे दुर्लक्ष करून भविष्यकाळातील गाजरं मराठवाड्यातील मतदारांसमोर ठेवल्याशिवाय पर्याय नाही असंच सध्यातरी म्हणावं लागेल.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x