25 April 2024 3:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

विश्वचषकात पाकिस्तानला सातव्यांदा लोळवलं, भारताचं वर्चस्व कायम

Indian Cricket Team

मँचेस्टर : जागतिक क्रिकेटमधील ‘हायव्होल्टेज’ सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ धावांनी लोळवले. यासह भारताने विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करताना त्यांचा या स्पर्धेत सलग सातव्यंदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताने पन्नास षटकात पाच बाद ३३६ धावा उभारल्यानंतर पाकिस्तानचा डाव चाळीस षटकात ६ बाद २१२ धावांत रोखला गेला. दरम्यान पावसाच्या व्यत्ययानंतर पाकला अखेरच्या ५ षटकात १३६ धावांचे ‘सुधारित’ आव्हान मिळाले होते. परंतु त्यांना केवळ ४६ धावाच करता आल्या. सर्वात महत्त्वाचे या धमाकेदार विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकविरुद्ध झालेल्या पराभवाची व्याजासहीत परतफेडही केली.

वरुण राजामुळे अनेकदा खेळ थांबविण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार चाळीस षटकात ३०२ धावांचे आव्हान मिळाले आणि तेव्हा पाकिस्तानने ३५ षटकात ६ बाद १६६ धावा केल्या होत्या. हे आव्हान अवाक्याबाहेरचे ठरल्याने नंतर पाकने विजयाचे सर्व प्रयत्नही सोडले आणि केवळ सामना पूर्ण होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली होती.

धावांचा पाठलाग करताना फखर झमान (६२) आणि बाबर आझम (४८) यांचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही. इमाम उल हकला (७) विजय शंकरने बाद केल्यानंतर झमान-आझम यांनी १०४ धावांची भागीदारी केली. परंतु, यानंतर पाकिस्तानने ४८ धावांत ५ फलंदाज गमावले आणि सामना भारताच्या बाजूने झुकला.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x