28 March 2024 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेत एकूण ४९ जागा लढवणार: राजू शेट्टी

Raju Shetty, swabhimani shetkari sanghatana, Prakash Ambedkar, Congress, NCP, Maharashtra State Assembly Election 2019

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राज्यातील सर्वच लहान मोठे पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेस-एनसीपीच्या जागावाटपाची अजून बोलणी झाली नसताना इतर लहान सहकारी पक्षांनी त्यांनी किती जागा लढवायच्या ते निश्चित करण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत देखी काँग्रेस आघाडीला फक्त खेळवत बसण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतल्याचे प्रथम दर्शनी तरी दिसत आहे. तुम्ही आम्हाला किती जागा द्याव्यात यापेक्षा आम्हीच काँग्रेसला ४० जागा सोडतो असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.

मात्र असं असलं तरी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या सोबतीला जाऊन बसलेले राजू शेट्टी यांनी विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटना एकूण ४९ जागा लढवणार असल्याचं कालच्या बैठकीत स्पष्ट केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात २ दिवसीय कार्यकारणीची बैठक पार पडली त्यात हा ठराव एकमताने पारित करण्यात आला आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत काँग्रस-एनसीपीने आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले आणि सांगली अशा एकूण २ जागा सोडल्या होत्या. सांगली आणि हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडण्यात आले परंतु या दोन्ही मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पराभवाचा सामोरं जावं लागलं आणि त्यात राजू शेट्टींसारख्या दिग्गज नेत्यांना पराभव सहन करावा लागला. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या बोलणीत जास्त वेळ न घालवता विधानसभेची रणनीती ठरविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ४९ जागांवर तयारी सुरु केल्याचं वृत्त आहे.

दरम्यान कालच्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने दुधाच्या आणि प्लॅस्टिक बंदीचा फेरविचार करावा यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे प्रचंड नुकसान होणार आहे. तसेच केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात प्रोत्साहन बंद केल्याने कांद्याचे दर प्रतिक्विंटल ४०० रूपयाने खाली कोसळले आहेत. तेंव्हा केंद्राने ताबडतोब निर्यात अनुदान त्वरित चालू करावे असं आवाहन केलं आहे. महाराष्ट्राचा कृषी क्षेत्राचा आर्थिक वेग उणे ८ टक्के इतका खालावलेला आहे. शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी विनाअट सरसकट सात बारा कोरा व शेतीचे संपूर्ण वीज बील माफ करून नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे म्हणून शासनाने कर्जमाफी व वीज बील माफी हे दोन्ही निर्णय त्वरित घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)#NCP(372)#Raju Shetty(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x