25 April 2024 11:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

आ. भातखलकरांचा पत्ता कट होणार? उत्तर भारतीय नेते रमेशसिंग ठाकूर यांना संधी?

BJP Mumbai, BJP Maharashtra, MLA Atul Bhatkhalkar, Former MLA Ramesh Singh Thakur, Maharashtra State Assembly Election 2019

मुंबई : विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पक्षांतर्गत स्पर्धा देखील वेगाने होऊ लागल्या आहेत आणि त्यात विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यासाठी अनेक नेते मंडळी सरसावल्याचे दिसत आहे. त्याचाच प्रत्यय सध्या कांदिवली मतदारसंघात पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय मतदार असल्याने काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार रमेशसिंग ठाकूर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तशा प्रकारच्या हालचाली इथल्या भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळत असून विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध बंड पुकारलं जाऊ शकतं.

काँग्रेसमध्ये आमदार पद भूषविणारे रमेशसिंग ठाकूर २०१४ मधील निवडणुकीत पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. स्वतः शिकलेले नसले तरी ते शिक्षण सम्राट आहेत हे नवल आणि अर्थशक्तीच्या बळावर विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांचा पत्ता कट होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. आजच्या घडीला या मतदारसंघात भाजपचे एकूण ७ नगरसेवक आहेत. मात्र हे सर्व नगरसेवक आमदार अतुल भातखालकरांवर प्रचंड नाराज असल्याचं समजतं. त्यांच्या फटकळ आणि चिडून बोलण्याच्या स्वभावामुळे कार्यकर्ते देखील नाराज आहेत.

दरम्यान धारावीनंतरची सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या हनुमान नगरची एकत्रित विकास योजना अतुल भातखालकरांमुळेच रखडल्याचं स्थानिक रहिवासी सांगतात आणि त्यामुळे तब्बल १८ हजार कुटुंबाच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिक मतदार देखील त्यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचं समजतं. कांदिवली विधानसभा मतदारसंघात ३५ टक्के मराठी मतदार, गुजराती-मारवाडी-जैन २७ टक्के मतदार तर २४ टक्के उत्तर भारतीय मतदार आहेत. त्यामुळे आघाडीत मनसे सामील झाल्यास काँग्रेस-एनसीपी-मनसे उमेदवार देखील मोठी लढत देऊ शकतो असा हा मतदारसंघ आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x