29 March 2024 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

भाजपच्या वरिष्ठांवर युती तोडण्यासाठी दबाव वाढला; स्वबळाची चाचपणी

Shivsena, BJP Maharashtra, Devendra Fadanvis, Chandrakant Patil, Amit Shah, Uddhav Thackeray, Aditya Thackeray

मुंबई : लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.

दरम्यान ‘एकदाची युती तोडा, हीच संधी आहे, स्वबळावर लढा’ असा दबाव जिल्ह्या- जिल्ह्यांमधून भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वावर येत आहे. मात्र, आपल्याला युती म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार, असे नेतृत्वाकडून सांगितले जात असल्याने कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.

युती तोडण्याबाबत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातून अधिक दबाव येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात युतीवरून अस्वस्थता दिसत आहे. शहरातील सर्व ६ मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. तिथे शिवसेनेला एकही जागा द्यायला स्थानिक नेते तयार नसल्याचे सांगण्यात येते. अशीच परिस्थिती नागपूर ग्रामीणमध्ये आहे. सावनेरवगळता सगळीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. शिवसेनेला एकही जागा दिली तरी भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदारास घरी बसावे लागेल. युतीत १४४ जागा घेण्याऐवजी रामदास आठवले यांचा रिपाइं, महादेव जानकरांचा रासप, सदाभाऊ खोत यांना सोबत घेऊन २८८ जागा लढवाव्यात, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

दरम्यान तसेच चित्र नाशिक, पुणे या शहरांमध्ये आहे. सर्व जागा भारतीय जनता पक्षाकडे असताना शिवसेनेला जागा देऊन आमदारांना घरी बसवणार का, असा कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदारांचा सवाल आहे. आम्ही पक्षाच्या शिस्तीनुसार माध्यमांसमोर बोलू शकत नाही; पण नेत्यांच्या गाठीभेटी होतात तेव्हा त्यांना युती करू नका, असेच सांगत आहोत, असे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीतील यशामुळे उत्साहात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वबळावरच निवडणूक लढावी असे वाटते. सोलापूर, सांगली, लातूर, अहमदनगरमध्येही स्थानिक नेत्यांचा स्वबळाचा सूर आहे. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने प्रसार माध्यमांना सांगितले की, युती तोडण्याचा दबाव नाही पण भावना आहेत. स्वबळावर लढलो तरी सत्ता येईल, असे काही जण सांगतात, पण हा सूर सार्वत्रिक नाही. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणाले की, स्वबळावर लढावे, असा आग्रह मुंबईतही आहे. दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र लोकांनाच हवे असल्याचे कार्यकर्ते म्हणवतात. सेनेला सोबत घेतले तर पुन्हा त्रास सहन करावा लागेल, अशी भावना आहे. सेनेचे आमदार, मंत्री मागताहेत महाजनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’ १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. ती आपल्या मतदारसंघातून जावी यासाठी शिवसेनेचे काही आमदार आणि मंत्र्यांनीही मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

युतीचा अंदाज येत नसल्याने आघाडीचे आमदार थांबले काँग्रेस, एनसीपीतून बाहेर पडू इच्छिणाºया ७५ टक्के आमदारांचा कल हा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा आहे; पण त्यांच्यापैकी काहींचे मतदारसंघ पूर्वीचे शिवसेनेच्या कोट्यातील आहेत. भाजपने ती जागा शिवसेनेकडून स्वत:च्या कोट्यात घ्यावी; कारण आपल्याला भारतीय जनता पक्षाकडूनच लढायचे आहे, असे या आमदारांचे म्हणणे आहे. तसे होत नाही तोवर पक्षांतराचा निर्णय त्यांनी रोखून धरला आहे.

त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेने आदित्य ठाकरे यांची ‘जण आशीर्वाद’ यात्रा सुरु केली आहे, ज्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. भाजपचा इतर राज्यातील अनुभव पाहता ते सहकारी पक्षालाच एकाकी पाडून आयत्यावेळी धाडसी निर्णय घेतात. लोकसभेच्या निकालानंतर तीच अवस्था बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याबाबतीत पाहायला मिळाली. मात्र तेथे लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्याने जेडीयू’च्या बाबतीत आयत्यावेळी भारतीय जनता पक्षाला काही करण्यास संधी मिळावी नव्हती.

महाराष्ट्रात विधानसभा लोकसभेसोबत झाली नाही, मात्र निकालानंतर भाजपने देशभर मोठी मुसंडी मारली. कॉग्रेस पक्ष लोकसभेत जवळपास शून्य झाला असून आगामी विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या सभा देखील कुचकामी ठरणार हे भाजपाला माहित आहे. त्यामुळे प्रचारात काँग्रेसकडे नैर्तृत्वच नाही अशी परिस्थिती आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जवळ केल्याने २०२४ मध्ये शिवसेनेचा दिल्लीतील पर्याय भाजपने शोधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती.

दरम्यान पुढचा मुख्यमंत्री कोण असणार, यावरून शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये कलगितुरा रंगला आहे. तर दुसरीकडे युती होणार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाची मंडळी करीत असली तरी मागचा अनुभव लक्षात घेता सावध झालेल्या शिवसेनेने यावेळी स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची माहिती पुढे येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रायगडमधील शिवसेनेच्या पदाधीकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर घेतली होती. रायगडपाठोपाठ मंगळवारी पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आले होते.

पालघर जिल्ह्यात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ असून ६ पैकी केवळ पालघरमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. तर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे एकूण ३ आमदार आहेत. पालघरमधून यावेळी दिवंगत नेते चिंतामन वनगा यांचे पूत्र श्रीनिवास वनगा यांना तिकिट देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण, त्यांना विधानपरिषदेवर पाठविण्यात येणार असल्याचेही आता बोलले जात आहे. खासदारकीपाठोपाठ आता आमदारकीचे तिकिटही त्यांना मिळण्याची शक्‍यता धुसर बनली आहे. तसेच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना पक्षातर्फे नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरविण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू असल्याचेही वृत्त आहे.

तर दुसरीकडे, जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईत परतले आहेत. मागील आठवडयात जनआशीर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद, आगामी काळातील तयारी यावर ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि वडिल उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली होते.

आदित्य यांच्या प्रवासाचा पहिला टप्पा शिवसेनेचे खासदार संजय राउत यांच्या कार्यक्षेत्रात होता. ते ज्या जिल्हयांचे संपर्कप्रमुख आहेत त्याच जिल्हयात पहिल्या टप्प्यात प्रवास झाल्याने यात्रेला आक्रमक रूप प्राप्त झाले. आदित्य हे राज्याचे नेतृत्व करू शकतात, ते भावी मुख्यमंत्री आहेत, शिवसेनेला अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद मिळणार आहे, असे आक्रमकपणे मांडण्यात आल्याने भारतीय जनता पक्षात काहीशी अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे सेनेचे मनसुबे देखील वेगळेच असल्याचं भारतीय जनता पक्षाला वाटत आहे. त्यामुळे कोणतीही वाच्यता न करत दोन्ही पक्ष स्वबळाच्या तयारीला लागले आहेत असं वृत्त आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x