20 April 2024 8:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

उस्मानाबाद: पवार कुटुंबीय देखील शिवसेनेच्या वाटेवर?

Shivsena, NCP, Sharad Pawar, Padmasinha patil, Ranajagjitsingh Patil, Osmanabad, Terna Sugar Factory

मुंबई : एनसीपीला एकामागून एक धक्के बसत असून या पक्षातील बडे नेते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जाण्याचे सत्र सुरुच आहे. एनसीपीच्या संस्थापकांपैकी एक असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आ. राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीची राज्यव्यापी शिवस्वराज्य यात्रा त्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यात आली असता यात्रेत सहभागी झाले नाहीत. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

पद्मसिंह पाटील हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे मेहुणे आहेत. बडे नेते पक्ष सोडून जात असताना आता जवळचे नातेवाईकही साथ सोडत असल्याने पवार कुटुंबाची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. राणा जगजितसिंह हे आजारी असल्याने शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होऊ शकले नाहीत, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. कोल्हापूरमधील एनसीपीचे माजी खासदार धनंजय महाडिक ३१ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव न घेता, बोचरी टीका केली. राणा जगजितसिंह पाटील यांनी पाठ फिरवल्याचा संदर्भ घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. पाटील यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्षावरही जोरदार टीका केली. लोकांची दिशाभूल करून भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली आहे. देशातील नव्हे जगातील सर्वात श्रीमंत पक्ष भारतीय जनता पक्ष आहे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी टीकास्र सोडले. तसेच आपण राहुल मोटे यांना हाताच्या फोडाप्रमाणे मागच्या तीन वेळा सांभाळले. त्यामुळे यापुढेही त्यांना सांभाळा, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.

एकीकडे राहुल मोटे यांच्यासारखा उमेदवार आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा करणारा नेता आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी तानाजी सावंत यांना लगावला आहे. पाच वर्षे आम्ही तुम्हाला सांगत होतो, नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता. जीएसटीची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केली. परंतु त्यावेळी तुम्हाला आमचे चुकीचे वाटत होते, मात्र आज अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. कारखाने, कंपन्या बंद पडले आहेत. दोन कोटी युवकांनी जे इंजिनिअिरग, डॉक्टरेट केलेले आहेत त्यांनी ६४ हजार जागांसाठी अर्ज केले आहेत. ही या देशाला मोदींची देण आहे, असाही आरोपही पाटील यांनी केला.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x