25 April 2024 9:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

गुजरातमधील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांवेळी अज्ञातवासात गेलेले नेते महाराष्ट्रात प्रकटले

MP Manoj Tiwari, MNS Chief Raj Thackeray

कल्याण : गुजरातमधील एका घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरून संतापाच वातावरण झाल्यानंतर हजारो परप्रांतीयांवर हल्ले करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यानंतर हजारो उत्तर भारतीयांनी रातोरात गुजरातमधून पलायन केलं होतं. मात्र या संपूर्ण घटनेनंतर भारतीय जनता पक्षातील आणि काँग्रेसमधील सर्व उत्तर भारतीय नेते अज्ञातवासात गेल्याचे दिसले होते.

महाराष्ट्रात आगपाखड करणारे सर्वांच्या सर्व उत्तर भारतीय नेते मूग गिळून शांत बसल्याचे महाराष्ट्राने पहिले होते. त्यात विषय थेट गुजरातशी संबंधित असल्याने भाजपमधील उत्तर भारतीय नेत्यांनी तोंड न उघडणारे नेते सध्या महाराष्ट्र विधानसभेत प्रचारासाठी प्रकटले असून, स्थानिक नेत्यांना धडा शिकविण्याचे भाष्य करत आहेत.

त्यात दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे गुजरातमधील ज्या आमदार अल्पेश ठाकोर याने उत्तर भारतीयांवर हल्ले घडवून आणले होते त्यांना गोड पेढा भरवत भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी भाजपात जाहीर प्रवेश दिला आहे. मात्र आजही मनोज तिवारी आणि इतर अन्य भाजप नेते तोंड उघडण्यास धजावत आहेत. त्यामुळे उत्तर भारतीय नेत्यांचे त्यांच्या समाजाप्रती असलेले बेगडी प्रेम पाहण्यास मिळत आहे.

महाराष्ट्रात प्रचारासाठी भाजपचे खासदार मनोज तिवारी प्रकटले असून, परप्रांतियांना मारहाण करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवणार, अशा शब्दात भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला आहे. कल्याणमध्ये आयोजित केलेल्या सभेत तिवारींनी उत्तर भारतीय मतदारांना भोजपुरीतूनच संबोधित केलं.

‘मुंबई, ठाणे, वाशी, ऐरोलीमध्ये काही जणांना धरुन-धरुन मारहाण केली जाते. कारण ते उत्तर भारतीय आहेत. मी तर हिरो आहे. चित्रपट करायचो, गाणी गायचो. मात्र अचानक माझ्यामध्ये नेता संचारला. मी ठरवलं विरोध करायचा. रस्त्यावर उतरलो, विरोध केला आणि त्यानंतर माझा विजय झाला’ असं मनोज तिवारी म्हणाले.

‘शिवसेनेचे लोक आमच्यासोबत आहेत, पण शिवसेनेतून वेगळं होऊन बाहेर पडलेले जे लोक आहेत, मला त्यांचं नाव घेण्याची गरज नाही. सगळ्यांना माहित आहे ते कोण आहेत ते. प्रांताच्या नावाखाली जर ते आमचे ठेले आणि गाड्या उधळणार असतील, तर त्यांना धडा शिकवणार’ अशा शब्दात मनोज तिवारींनी राज ठाकरेंना निवडणुकीपुरतीचा पोकळ इशारा दिला आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x