23 April 2024 4:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय? GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हा एक्झिट पोलच्या सर्व्हेचा भाग नसतो: सविस्तर

Exit Poll, Opinion Poll, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: यापूर्वी देशातील अनेक नामांकित प्रसार माध्यमांनी २०१४ ते २०१८ या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या जवळपास सर्वच एक्झिट पोलचा अभ्यास केला. त्यावरून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार, एक्झिट पोलमुळे आपल्याला केवळ कोण जिंकणार याचा अंदाज येतो, मात्र त्यातून कोणत्या पक्षाच्या नेमक्या किती जागा निवडून येतील, हे खात्रीपूर्वक समजू शकत नाही. अगदी यासंबंधित उदाहरण म्हणजे २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एकतर्फी जिंकेल असं भाकीत त्यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एक्झिट पोलनं केलं होतं. त्यावेळी C-Voterनं असा अंदाज व्यक्त केलं होतं की भारतीय जनता पक्षाला एकूण १११ जागा प्राप्त होतील आणि काँग्रेसला केवळ ७१ जागांवर समाधान मानावे लागेल. तर दुसरीकडे टुडे’ज चाणक्यनं म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षाला तब्बल १३५ जागा मिळतील आणि काँग्रेसला केवळ ४७ जागा मिळतील.

संबंधित एक्सिट पोलच्या आकडेवारीनुसार एकूण जागांपैकी तब्बल ६५ टक्के जागा या एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळतील असं जवळपास सर्वच एजन्सीजनं ठामपणे म्हटलं होतं. मात्र जर जाहीर झाल्यावर भारतीय जनता पक्षाच्या अंदाजापेक्षा तब्बल १० टक्के जागा कमी झाल्या आणि काँग्रेस सत्तेत येणार का असं चित्र सकाळी ११ वाजेपर्यंत दिसत होतं. भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत ९९ जागा मिळाल्या होत्या. अभ्यासातून हेच स्पष्ट झालं आहे की, एक्झिट पोलमधून केवळ विजेता पक्ष कोण याचा अंदाज वर्तविण्यात येतो, मात्र कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील हे सांगता येत नाही. तसेच एक्झिट पोलसाठी जो सर्व्हे केला जातो, त्यात कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील याचा अंदाज देखील घेतला जातो आणि मग त्या मतांच्या टक्केवारीवरून त्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील, याचे अंदाज वर्तविले जातात.

उदाहरणार्थ, एखाद्या पक्षाला २५ टक्के मत मिळणार असेल तर त्या आधारावर त्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील, हे ठरवलं जातं. मात्र कधीकधी एखाद्या पक्षाच्या मतांची टक्केवारी आणि निवडून आलेल्या जागांमध्ये मोठा फरक दिसून येतो. अनेकवेळा तर मतांची टक्केवारी तेवढीच असते, परंतु संबंधित पक्षानं फार कमी फरकानं जागा जिंकलेली किंवा हरलेली असते असं देखील निदर्शनास आलं आहे. त्यावर राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्या मते, “एखाद्या पक्षाच्या नेमक्या जागा किती येतील, हे एक्झिट पोल करणाऱ्यांच्या सँपलिंगवर अवलंबून असतं. आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे. त्यामुळे कोण जिंकणार हे सांगता येत असलं, तरी नेमक्या जागा सांगता येतीलंच, असं चित्र नाही.

मुख्य म्हणजे एखादा एक्झिट पोल व्यवस्थित करून देखील त्याचे अंदाज पूर्णपणे चुकू शकतात आणि मिळणाऱ्या जागांमध्ये देखील मोठी तफावत असते. जागा किती मिळतील, याबाबत मोठी अनिश्चितता असू शकते. अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे तेथे नेमकं अध्यक्ष होणार हे सांगणं सोपं आहे. मात्र भारतात शेकडो जागा आणि इथली जातीय समीकरणं आणि इतर सामाजिक प्रश्न असं बरंच विचारात घेणं गरजेचं असल्याने आपल्याकडे एक्सिट पोलचे अंदाज वर्तविणे त्यांत कठीण काम आहे. C-voterचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी देखील वेगळा मुद्दा मांडला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘मुळात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हा एक्झिट पोलच्या सर्व्हेचा भागच नसतो. कोणत्या पक्षाला किती मतं (टक्केवारी) मिळतील आणि त्या टक्केवारीच्या तुलनेत जागांचा अंदाज बांधला जातो’.

एक्झिट पोलबाबत ज्येष्ठ पत्रकार प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला यांच्या ‘The Verdict…Decoding India’s Election’ या पुस्तकात १९८० ते २०१८ दरम्यान झालेल्या ८३३ एक्झिट पोलचे अंदाज देण्यात आलेले आहेत. त्यानुसार, ‘एक्झिट पोल खरे ठरण्याचा अंदाज ८४ टक्के इतका आहे’. दरम्यान, पाश्चिमात्य देशांत एक्झिट आणि ओपिनियन पोलचे अंदाज खरे ठरतात. परंतु भारतात मात्र अंदाजांपेक्षा ते वेगळेही लागतात. भारतात याबाबत अजून सुधारणा होण्याची गरज आहे. पण हे सुद्धा खरं आहे की, जेवढी विविधता भारतीय मतदारांमध्ये आढळून येते तेवढी पाश्चिमात्य देशातल्या मतदारांमध्ये आढळून येत नाही.” “तिथल्या लोकांच्या धर्म आणि जाती बरेचदा सारख्याच असतात. तसंच भारताच्या तुलनेत तिथं निवडणुका लढवणारे पक्ष देखील कमी असतात. त्यामुळे एक्सिट पोलबाबत भारतात खात्री देने शक्य नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#Election2019(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x