26 April 2024 4:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

साताऱ्यात घडाळ्याचं बटन दाबलं तर व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह दिसायचं

NCP, Satara Loksabha Election 2019, MP Udayanraje Bhosale

सातारा: विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडलं. मात्र जवळपास ६५ ठिकाणी ईव्हीएम संबंधित तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. आधीच देशभरात ईव्हीएम’ला अनुसरून अनेकांच्या तक्रारी असताना देखील यावेळी सुद्धा तेच प्रकार समोर आले आहेत. मात्र यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे मागील अनेक निवडणुकांमध्ये जेव्हा कोणतही बटण दाबलं जात तेव्हा ते मत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा मनसे या पक्षांना जाण्याची उदाहरणं समोर न येता, ज्या तक्रारी आल्या त्या बटण दाबल्यावर फिरणारं मत भाजपाला म्हणजे कमळाकडेच कसं वर्ग होतं हा संशोधनाचा विषय बनला आहे.

तसाच काहीसा प्रकार काल साताऱ्यात घडला आहे. काल साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान पार पडलं. परंतु, सातारा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर राष्ट्रवादी पक्षाच्या घडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत वर्ग होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत ग्रामस्थांनी यासंदर्भातील तसा आरोप केला आहे.

साताऱ्यातील नवले गावातील मतदान केंद्रावर सदर प्रकार घडल्याचं वृत्त आहे. काल सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक मतदारांनी एनसीपीच्या उमेदवारासाठी घडाळ्यासमोरील बटन दाबल्यास व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मत जात असल्याचं निदर्शनास आलं. ग्रामस्थांनी सदर प्रकार तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास देखील आणून दिल्याचे वृत्त आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आणि पुढील मतदान पुन्हा पार पडले.

मात्र धक्कादायक गोष्ट यासाठी आहे कारण, ग्रामस्थांच्या या तक्रारींकडे सुरुवातीला मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परंतु, त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आणि बाहेर गोंधळ वाढला तेव्हा निवडणूक अधिकारी प्रकरण तापू नये म्हणून खडबडून जागे झाले. त्यानंतर बाहेर पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे नवले गावात काल मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण पाहायला मिळालं होतं.

ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा प्रकार मतदानाला सुरुवात झाल्यानंतर तब्बल चार तासांनी लक्षात आला. तोपर्यंत दोनशेहून अधिक मतदारांनी मतदान केलं होतं. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी तातडीने दखल का घेतली नाही, असा प्रश्न मतदार विचारत आहेत. तसंच आधी झालेल्या मतदानाचं काय करणार याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. या घटनेची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेणं आवश्यक आहे, अशी मागणी आता मतदार करत आहेत.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x