24 April 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

विधिमंडळातील घोषणाबाजी पेक्षा मोदींकडे राज्याच्या हक्काचे १४,६०० कोटी मागा: जयंत पाटील

Minister Jayant Patil, Opposition Leader Devendra Fadnavis, Chief Minister Uddhav Thackeray

नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्षाने विधानसभेत गदारोळ केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी शब्द पाळून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर, अर्थमंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेत दोन्ही आमदारांमध्ये समन्वय साधला. त्यानंतर, यांनी फडणवीसांनाच प्रश्न विचारले.

तत्पूर्वी, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमध्ये थेट हाणामारी झाली आहे. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, राज्य सरकारने अवकाळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ६६०० कोटी रुपयांची मदत दिली आहे. त्यातले २१०० कोटी रुपये जिल्ह्यांपर्यंत पोहचले आहेत. तुम्हाला खरंच शेतकऱ्यांची काळजी असेल तर केंद्राकडून राज्य सरकारचे पैसे मागावेत. राज्य सरकारचे १४,६०० कोटी केंद्राने अडवले आहेत. फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात घोषणाबाजी करण्यापेक्षा मोदींकडे पैसे देण्याची विनंती करावी, असेही अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

 

Web Title:  Demand Rupee 14600 Crore from PM Narendra Modi says Minister Jayant Patil to Devendra Fadanvis ove Farmer issue.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x