26 April 2024 1:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर २७ जानेवारीपासून मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरु

Environment Minister Aaditya Thackeray, Night Life in Mumbai

मुंबई: मुंबईत नाईट लाईफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ‘पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,’ अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ‘मुंबईचा महसूल वाढण्यासाठी आम्ही २०१३ मध्ये ही नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. आता सात वर्षानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे. यामुळे रोजगारात वाढ होणार आहे. २७ जानेवारीपासून नाईट लाईफबाबतचा नियम लागू होईल,’ अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

नाईट लाईफमुळे पोलिसांवर ताण येणार असल्याच राजकीय नेत्यांकडून सांगितलं जात आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं. आता पोलिसांना गस्तीच काम असतं. पण, नाइट लाइफमुळे पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही असं देखील आदित्यमुंबईत नाईट लाईफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ‘पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,’ अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ‘मुंबईचा महसूल वाढण्यासाठी आम्ही २०१३ मध्ये ही नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. आता सात वर्षानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे. यामुळे रोजगारात वाढ होणार आहे. २७ जानेवारीपासून नाईट लाईफबाबतचा नियम लागू होईल,’ अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, सामान्य जनेतेचे जीवन असुरक्षित असताना ‘नाइटलाइफ’चा घाट कोणाचे बालहट्ट पुरविण्यासाठी घेतला जात आहे? असा बोचरा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला. २७ जानेवारीपासून मुंबईमध्ये नाइटलाइफ सुरु करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. त्यावर ते बोलत होते.

ही नाइटलाइफ नसून किलिंग लाइफ आहे. मुंबईतील कमला मिल येथे आग लागली होती. त्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या नाइटलाइफला रक्तरंजित इतिहास आहे, हे निर्णय घेणाऱ्यांना माहिती नाही का?’ असा सवाल करत आशिष शेलार यांनी सरकारच्या नाइट लाइफ निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या टीकेचा आदित्य ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. ‘महाविकास आघाडी जनतेच्या हितासाठी काम करतेय. लोकांच्या भल्याचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. ‘नाइट लाइफ’चा प्रयोग रोजगार निर्मितीसाठी करत आहोत. आमचं मन स्वच्छ आहे. शुद्ध हेतूनंच आम्ही हा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर टीका करणाऱ्यांची मनं प्रदूषित आहेत,’ असा टोला आदित्य यांनी हाणला.

 

Web Title:  Environment Minister Aaditya Thackeray talked about Nightlife in Mumbai after cabinet meeting.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x