29 March 2024 3:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

गांधींना मारणारा हिंदूच होता; १५% मुस्लिमांच्या नावाने ८५% हिंदूंना भीती दाखविण्याचा प्रयत्न

Urmila Matondkar, Nathuram Godse, Mahatma Gandhi

पुणे: नागरिकत्व दुरुस्ती कायदा मुस्लिमविरोधी आहेच, पण तो प्रत्येक गरीबाच्या विरोधात आहे, असं विधान अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे. १५ टक्के मुस्लिमांच्या नावाखाली ८५ टक्के हिंदूंना भीती दाखवून त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न होत आहे, असंही त्यांनी सांगितलं. पुण्यात एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान, या कार्यक्रमात हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला.

‘केंद्र सरकारनं केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा काळा कायदा आहे. तो केवळ मुस्लिमविरोधीच नाही तर तो गरीब विरोधीही आहे,ट अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी केली. देशात सध्या सगळ्या गोष्टी हिंदू मुस्लिम या पातळीवर आणून ठेवल्या जात आहेत. पण संविधानात जात, धर्म, लिंगावरून भेदभाव केला जात नाही, अशा गोष्टींना संविंधानात थारा नाही असं सांगत उर्मिला यांनी सीएए रद्द करण्याची मागणी केली.पुण्यातील गांधीभवनमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधी अहिंसात्मक जनआंदोलन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी सीएएवरून केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली.

पुढे मातोंडकर म्हणाल्या, ‘ महात्मा गांधी यांच्या विचारधारेचा आपण भाग आहोत, हा अभिमानाचा भाग आहे. घोषणाबाजी करणाऱ्यांनाही गांधीजींना अभिवादन करायला राजघाटावर जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. भारतीयता सर्वांच्या नसानसात आहे. अहिंसेविरुद्ध काहीही चालू देऊ नका. केवळ संसद म्हणजे देश नाही. नागरिक म्हणजे देश आहे, हे या कायद्याच्या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे. आपला देशच आपल्याला ओळखू येणार नाही, इतका बदलू देऊ नका असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले ‘

‘लोकशाही म्हणजे लोकप्रतिनिधी नव्हे तर नागरिक होत. फॅसिझम फक्त अहिंसेपुढेच झुकेल. भारत हा गांधी विचारांचा देश आहे. ही ओळख पुसू देऊ नका. हा कायदा भारतीयत्वाला ललकारणारा आहे. या लढ्यात आग विझवणाऱ्या चिमणीप्रमाणे प्रत्येकाने योगदान द्यावे,’ असे आवाहन उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे.

 

Web Title:  Hindu murder the Mahatmha Gandhi says congress leader Urmial Matondkar.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x