29 March 2024 2:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

आपण केवळ दंगल झाल्यानंतरच हिंदू असतोः राज ठाकरे

Maha Morcha, Raj Thackeray

मुंबई: पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही मोर्चात सहभागी होत मोर्चाला पाठिंबा दिला आहे. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यांनतर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे कान टोचण्याबरोबरच सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनाही सज्जड दम दिला.

मनसेच्या महामोर्चात राज ठाकरे यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात एल्गार पुकारला. यावेळी त्यांनी सीएए-एनआरसी विरोधात मोर्चा काढणाऱ्यांना इशारा दिला. तसेच हिंदूवरही भाष्य केले. आपण केवळ दंगल झाली की हिंदू असतो. एरवी तसे आम्हाला जाणवत नसते, असा टोला त्यांनी लगावला.

जे या देशाचेच नाहीत त्यांच्याकडे आपण का पुरावे मागायचे. बॉम्बस्फोट झाला की आपण फक्त मेणबत्त्या काढायच्या. माझ्या महाराष्ट्रातील पोलिसांना ४८ तास मोकळं सोडा. गुन्हेगारी शून्य होईल. घुसखोरांची सफाई आता झालीच पाहिजे. याबाबत राज्य सरकारला सांगून उपयोग नाही. केंद्रालाच सांगायला हवं, असेही त्यांनी यावेळी म्हटलं.

पुढे राज ठाकरे म्हणाले की, सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर समर्थक. ठोस भूमिका म्हणून काही आहे की नाही. तीच आम्ही घेतो. देशात अनेक बाॅम्ब ब्लास्ट झाले त्यामागे दाऊद इब्राहीम, त्याला पाकिस्ताननं सांभाळलं. ज्यावेळी केंद्राचे चुकीचे निर्णय झाले त्यावेळी टीका केली,जेव्हा चांगली गोष्ट झाली तेव्हा अभिनंदनही केलं. आज पाकिस्तान टेररीस्टचा अड्डा, लादेनही पाकिस्तानमधे सापडला. कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांग्लादेशींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे. यापुढे दगडाला दगड आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल. इतर देशापेक्षा भारताने तुम्हाला इतकं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे एकोप्याने राहा, देशाशी वाकडं घेऊ नका. हा देश साफ करावा लागेल. केंद्राला कारवाई करावी लागेल अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकर यांनी कडक इशारा दिला आहे.

२०१२ च्या मोर्च्यात मी एका बांग्लादेशी दंगेखोराचा पासपोर्ट दाखवला होता ज्यांनी ह्याच आझाद मैदानावर पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला होता.ह्यांची मजल बघा. ह्यांना हुसकावलंच पाहिजे. अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे.

 

Web Title:  Story Hindus are not alert they become Hindus only during the riots say MNS Chief Raj Thackeray at Mumbai Maha Morcha.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x