25 April 2024 9:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

कोरोनाच्या नावाने लोकांना का घाबरवत आहात: राज ठाकरे

Corona Virus, MNS Chief Raj Thackeray

औरंगाबाद, ११ मार्च : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणच्या यात्रा आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यातच आता औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक पुढे ढकण्याची मागणी करण्यात आली आहे. खुद्द महापौरांनीच ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येत्या एप्रिल महिन्यात औरंगाबाद महापालिकेची मुदत संपणार आहे.

कोरोना व्हायरसची भीती पाहता महापालिका निवडणूक सहा महिने पुढे ढकला अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच निवडणूक पुढे ढकलताना पालिकेवर प्रशासक नेमू नये. विद्यमान नगरसेवकांनाच सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडले यांनी केली आहे.

दुसरीकडे शिवजयंतीसाठी औरंगाबाद येथे दाखल झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कार्यक्रम आयोजित करण्यास नकार देण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कार्यक्रमांना नकार दिला आहे. परंतु, यावर राज ठाकरे यांनी नाराजी दर्शवली आहे. कोरोना विषाणूमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्याकडे अद्याप त्याची तीव्रता नाही. ‘पॅनिक’ करण्यासारखं राज्यात घडलेले नाही. लोकांना का घाबरवत आहात, असा सवाल राज ठाकरे यांनी प्रशासनाला केला आहे. ते औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, नाशिकला १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पोलिसांनाच माहिती नाही याबाबत. प्रशासन दहशत निर्माण करत आहे. लोकांना घाबरवत आहे. शिवजयंतीला का परवानगी नाही, मग औरंगाबादच्या निवडणुका पुढे ढकलणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला.

 

News English Summery: MNS chief Raj Thackeray, who has come to Aurangabad for Shiv Jayanti, has been refused the function. The administration has denied the program in the wake of the Corona virus. However, Raj Thackeray has expressed his displeasure over this. He has raised the question of whether the Aurangabad municipal elections will be postponed due to the corona virus. You don’t have the intensity of it yet. Nothing like ‘panic’ has happened in the state. Raj Thackeray has asked the administration why they are scaring people. He was talking to the media in Aurangabad. Raj Thackeray further said that section 144 has been applied to Nashik. The police do not know. The administration is creating panic. Scare people. He asked why Shiv Jayanti is not allowed, then will the Aurangabad elections be postponed.

 

Web News Title: Story why are you scaring people MNS Chief Raj Thackeray question on Corona Virus.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x