29 March 2024 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

लोकांना गांभीर्य नाही, आता संचारबंदी हाच उपाय..राष्ट्रवादी व मनसेची मागणी

Minister Jitendra Awhad, MLA Raju Patil, Corona Crisis

मुंबई, २३ मार्च: कोरोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली पाहिजे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संचारबंदी हा एकमेव उपाय असल्याचंही ते म्हणाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.

‘कोरोना’चा प्रसार दिवसागणिक वाढत असून बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत हा आकडा ८९ वर पोहोचला आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारनं संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसंच, सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. एकप्रकारे महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशातील अनेक राज्यांतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. मात्र, सरकारच्या आदेशानंतरही लोक बिनधास्त रस्त्यावर येत आहेत.

मंत्री जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८९ वर पोहचली आहे. मात्र तरीदेखील लोक गांभीर्याने घेत नाहीत. मी स्वत: फिरुन हा अनुभव घेत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच लोक ऐकत नसल्यामुळे राज्यात संचारबंदी हाच एकमेव उपाय असल्याचे सांगत आता नाही, तर कधीच नाही अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

दरम्यान, परिस्थितीचा अंदाज आल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी चिंता व्यक्त करताना सरकारला संचारबंदीचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आमदार राजू पाटील यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, कारण लोकं अजूनही कोरोना व्हायरस’बाबत गंभीर दिसत नाहीत. म्हणूनच जमावबंदी नको संचारबंदीच लागू करायला हवी. सतत नियमात बदल केल्याने सरकारी यंत्रणा व जनता पण गोंधळली आहे’ असं म्हटलं आहे.

 

News English Summery:  Minister Jitendra Awhad tweeted that the situation in the state was serious. The number of corona virus patients has now reached 89. However, people do not take it seriously. Jitendra Awhad said that I am experiencing this by myself. Similarly, Jitendra Awhad has urged Uddhav Thackeray that communication is the only solution in the state as people are not listening. Meanwhile, MNS MLA Raju Patil has expressed concern over the situation and demanded the government to take a decision on the ban. MLA Raju Patil has tweeted that the government should take some concrete decision as people are still not serious about the corona virus. Therefore, mobilization should not be imposed. It is said that the government system and the people are also confused by the changes in the rules.

 

News English Title: Story NCP Leader Jitendra Awhad and MNS MLA Raju Patil has requested CM Uddhav Thackeray impose ban communication state News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x