कोरोनाच्या संसर्गासंदर्भात अमिताभ बच्चन यांनी चुकीची माहिती प्रसिद्ध केली
मुंबई, २६ मार्च: चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला तो हुबेई प्रांतातल्या वुहान या शहरातून. वुहानमधून हा विषाणू जगभरात पसरला आणि त्यानं रौद्र रूप धारण केलं. आता कोरोनाव्हायरसचं केंद्र चीनमधून इटलीत हललं आहे. स्पेनमधली दोन शहरही केंद्र होण्याच्या वाटेवर आहेत. आशिया खंडात आता चीननंतर भारताकडे धोका म्हणून पाहिलं जात आहे. त्यातही महाराष्ट्र आणि मुंबई या महासाथीचं भारतातलं केंद्र बनतं की काय अशी भीती आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. ती संख्या ही बातमी प्रसिद्ध होईपर्यंत १२५ होती. गुरुवारी दिवसभरात कोरोनाव्हायरग्रस्तांची संख्या फक्त मुंबईत १५ ने वाढली. मुंबई महानगरात दिवसभरात दोन कोरोनाग्रस्त महिलांचे मृत्यूही झाले. आता मुंबईत उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बस ७७ वर पोहोचली आहे. या साथीचा पॅटर्न पाहता मुंबईत धोका वाढला आहे.
दरम्यान याच परिस्थितीवर बोलताना अमिताभ यांनी चीनने केलेल्या संशोधनाचा हवाला देत ट्विट मध्ये म्हटले होते की, ‘आपला संपूर्ण देश कोरोनाविरोधात झुंज देत असूूून चीनच्या संशोधनात दिसून आले आहे की, कोरोना विषाणू मानवी विष्ठेमध्ये कित्येक आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतो आणि विष्ठेवर बसलेली माशी जर फळे, भाज्या अथवा अन्य कोणत्याही खाण्यापिण्यासारख्या पदार्थावर बसली तर ते दूषित होऊन कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, म्हणूनच उघड्यावर शौचास बसू नका आणि शौचालयाचा वापर करा. आपल्या घरात सुरक्षित रहा, असे या ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओतून अमिताभ यांनी आवाहन केले होते.
T 3481 – A study in the @TheLancet shows that coronavirus lingers on human excreta much longer than in respiratory samples.
Come on India, we are going to fight this!
Use your toilet: हर कोई, हर रोज़, हमेशा । Darwaza Band toh Beemari Band! @swachhbharat @narendramodi @PMOIndia pic.twitter.com/VSMUHdjXKG— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 25, 2020
त्यानंतर आज नवी दिल्लीमध्ये नैमित्तिक पत्रकार परिषदेत लव आगरवाल यांनी कोरोना विषाणूच्या भारतातील संक्रमणाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढते आहे हे निश्चित. पण त्याची गती बघितली तर फैलाव अजून आटोक्यात आहे. अर्थात हे खूप प्राथमिक निरीक्षण आहे. यावेळी त्यांना माश्यांमुळे कोरोना व्हायरस पसरतो का, या अमिताभ बच्चन यांच्या व्हि़डीओवरून प्रश्न विचारला असता त्यांनी सरळ नाही असे उत्तर दिले. तसेच मी त्यांचे ट्विट पाहिलेले नाही. मात्र, एवढे जरूर सांगू शकतो की व्हायरसचे संक्रमण माश्यांमुळे होत नाही.
Community transmission phase of #COVID19 will start if the community & we (the govt) don’t work collectively & follow guidelines. But it would never happen in India if we follow social distancing & treatment properly: Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry pic.twitter.com/7mBg30g6bF
— ANI (@ANI) March 26, 2020
News English Summery: Citing China’s research, Amitabh said in a tweet, “China’s research has shown that our entire country is struggling against corona, and that the corona virus can survive in human feces for weeks, and if the flies are on fruits, vegetables, or any other food. If sitting, it can become corrupted and infect the corona, let’s say Do not sit on the toilet and use the toilet at the open door. Amitabh had appealed from a video shared on Twitter saying “stay safe in your house”. Later in a press conference in New Delhi today, Love Agarwal informed about India’s transmission of the corona virus. That said, it is certain that the number of corona infections is increasing. But if we look at its speed, the spread is still under control. Of course this is a very basic observation. When asked about Amitabh Bachchan’s video, he was not straightforward when asked if he could spread the Corona virus due to fishes at this time. Also I haven’t seen their tweet. However, one can say with certainty that the virus is not transmitted by fish.
News English Title: Story corona virus Bollywood Superstar Amitabh Bachchans claim corona spread flies was false health ministry News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- Numerology Horoscope | 13 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल
- Govt Employees Salary | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि ईपीएफ मर्यादा वाढणार, महत्वाची अपडेट आली
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
- IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल