28 March 2024 9:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

पुणे-सातारा रस्त्याच काम रखडविणाऱ्या 'रिलायन्सला' टोलवाढीची भेट

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ पुणे (देहूरोड)- सातारा रस्त्याच्या सहा पदरीकरणाचं केवळ अडीज वर्षाचं काम तब्बल साडेसात वर्ष रखडलेलं असताना देखील उलट सरकारच त्यांना वेळोवेळी मुदतवाढ करून देत होती आणि आता त्या दिरंगाईचा सरकारी नजराणा म्हणून ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला टोलवाढीची भेट सरकारकडून देण्यात आली आहे.

येत्या एप्रिलपासून या रस्त्यावरील खेडशिवापूर ते आणेवाडी टोलनाक्यावरील टोलच्या दरात वाढ केली जाणार असून ही रोजच्या प्रवाश्यांना वाईट बातमी आहे. ज्या ठेकेदाराला स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काळ्या यादीत शामिल करण्याचं भाष्य केलं होतं, परंतु पुन्हा रिलायन्सला वेळोवेळी सूट मिळत गेली आहे आणि इतकेच नाही तर ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला टोलवाढीची भेट सरकारकडून देण्यात आली आहे.

वास्तविक या १०४ किलोमीटर रस्त्याचं काम ऑक्टोबर २०१० मध्ये सुरु झाले होते जे मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यामुळे सजग नागरिक मंचच्या वतीने माहितीच्या अधिकारात विवेक वेलणकर यांनी वेळोवेळी या कामाच्या प्रगती बाबत माहिती अधिकारात सरकारकडून तपशील मागवला. त्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीत त्या रस्त्याच्या कामाबाबत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर दिरंगाई करत असल्याचे उघड झाले आहे.

१४ ऑगस्ट २०१६ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत अनेक लोकप्रतिनिधींनी पुणे सातारा रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीच त्यांनी अशा दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिला होता परंतु तशी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

विवेक वेलणकर म्हणाले की जर काम वेळेत होत नसेल तर टोल बंद झाला पाहिजे. परंतु इथे उलट दिरंगाईच ‘टोलवाढ’ हे बक्षिसच सरकारने ठेकेदार कंपनीला दिले आहे.

हॅशटॅग्स

#Toll Cha Zol(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x