19 April 2024 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

त्रिपुरात लोकसभेच्या २ जागा आहेत, मग भाजपने देशभर आनंद व्यक्त का केला ? विरोधक

नवी दिल्ली : सपा – बसपा शेवटच्या क्षणी एकत्र आले म्हणून लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा २ जागांवर पराभव झाला असे विधान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एका खासगी वृत्त वहिनीला दिल्याने विरोधकांकडून ही प्रतिक्रिया कानावर येत आहे.

समाजवादी पक्ष आणि बसपा शेवटच्या क्षणी एकत्र आल्याने उत्तर प्रदेश मधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता असं मान्य करून, भाजपने पराभवाचे नक्की कारण शोधण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. पुढे येणाऱ्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजप एकूण मतदानाच्या पन्नास टक्के मतदान मिळवून सर्वात मोठा पक्ष असेल असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी म्हटलं आहे. तसच सपा-बसपाची ती खेळी २०१९ मध्ये निष्फळ ठरेल असं ही अमित शहा म्हणाले.

मुळात उत्तर प्रदेशातील निवडणूक ही केवळ २ जागांपुरतीच होती तरी सुद्धा काँग्रेसने मिठाई वाटल्याचे समजले. परंतु आम्ही त्यांच्याकडून ११ राज्य घेतली तसेच त्रिपुराबाबत सुद्धा कोणी बोलत नाही. मुळात पोटनिवडणुका ह्या स्थानिक मुद्यांवर केंद्रित असतात. त्याविरुद्ध सार्वत्रिक लोकसभा निवडणूकात मोठे मुद्दे विचारात घेतले जातात असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना आणि टीडीपी बाबत विचारले असता अमित शहा म्हणाले की, एकूण ११ मित्र पक्षांपैक एकानेच एनडीएला रामराम ठोकला आहे आणि त्यांनी आम्हाला काहीच फरक पडत नाही अशी पुस्ती सुद्धा त्यांनी जोडली. अमित शहा जरी केवळ एकच पक्ष सोडून गेल्याचे म्हणाले असले तरी वास्तविक पाहता शिवसेना आणि गोरखा जनमुक्ती मोर्चाने सुद्धा एनडीए बरोबर फारकत घेतली आहे आणि अकाली दल सुद्धा नाराज असल्याचे समजते.

काय म्हणत आहेत विरोधक अमित शहांच्या युपी मधील ‘केवळ दोन’ जागांच्या वक्तव्यावर,

जर अमित शहा असं म्हणत असतील कि विरोधकांनी यूपीतील लोकसभेच्या केवळ २ जागा जिंकल्या म्हणून देशभर आनंद व्यक्त केला होता. भाजपने त्रिपुरा विधानसभा जिंकली असली तरी, संपूर्ण त्रिपुरात लोकसभेच्या केवळ २ जागा आहेत हे माहित असताना अमित शहांनी नागालँड आणि मणिपूर चे निकाल येण्यापूर्वीच घाई घाईत पत्रकार परिषद का बोलावली. त्यामागील मुख्य कारण देशभरात केवळ हवानिर्मिती करून वातावरण तापत ठेवणे असाच होता. वास्तविक संपूर्ण त्रिपुरात लोकसभेच्या केवळ दोनच जागा आहेत, जसं अमित शहा यूपीतील पराभवाचे वर्णन करताना लोकसभेच्या केवळ २ जागा आम्ही हरलो, ज्याने काहीच फरक पडत नाही असं स्पष्टीकरण देत आहेत.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x