19 March 2024 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Vs RVNL Share Price | रेल्वे सेवा संबंधित शेअर्स खरेदी करावे? 1 वर्षात मल्टिबॅगर परतावा दिला, पण पुढे काय होणार? Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत Mutual Fund SIP | पगारदारांनो! महिना 3000 रुपयांची SIP बचत देईल कोटी मध्ये परतावा, रक्कम जाणून घ्या Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिस FD विरुद्ध बँक FD पैकी अधिक व्याज कोणत्या योजनेत मिळेल तपासून घ्या Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Numerology Horoscope | 19 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

लॉकडाउननंतर परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी मुंबई पुण्यातून गाड्या सोडा - अजित पवार

Corona Crisis, Covid 19, Maharashtra, Ajit Pawar

मुंबई, २३ एप्रिल: येत्या ३ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वे सुरू झाल्यावर राज्यातील विविध भागात थांबलेले परप्रांतीय मजूर त्यांच्या घरी जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडून गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने या मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यातून विशेष रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.

केंद्र सरकारने २४ मार्चपासून देशव्यापी टाळेबंदी लागू केल्यापासून उत्तरप्रदेश, बिहारसह देशाच्या विविध राज्यातील मजूर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. राज्य शासनातर्फे त्यांच्यासाठी शिबिरव्यवस्था केली असून त्यांना निवास, भोजन, आरोग्यसेवा पुरवण्यात येत आहे. राज्यशासनाच्या शिबिरांमध्ये आजमितीस साडेसहा लाख मजूर राहत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारेही तितक्याच मजूरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे राज्यातील उद्योग, बांधकाम, सेवाक्षेत्र बंद असल्यामुळे या मजूरांच्या हाताला काम नाही. दीड महिन्यांपासून शिबिरात राहिल्यामुळे ही मंडळी आपापल्या घरी, कुटुंबात जाण्यास अधीर आहेत, असं अजित पवार यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केंद्राकडे केली होती. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कालच कोणतीही विशेष रेल्वे सोडण्यात येणार नसल्याचं सांगत मुख्यंत्र्यांची मागणी फेटाळून लावली होती.

 

News English Summary: After the lockdown ends on May 3, when the train resumes, a large number of foreign workers, who have stopped in various parts of the state, are expected to rush out to their homes. Deputy Chief Minister Ajit Pawar has asked Union Railway Minister Piyush Goyal to release special trains from Mumbai and Pune to take the workers to their homes as law and order situation is likely to arise.

News English Title: Deputy Chief Minister Ajit Pawar urges center to arrange special trains for migrant workers stuck in Maharashtra.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x