26 April 2024 5:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

शिवसेनेची टीका, अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत 'गाजर' हलवा झाला

मुंबई : सामना अग्रलेखातून शिवसेनेने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या दिल्लीतील रामलीला मैदानावरील उपोषणावर सडकून टीका केली आहे. सामना अग्रलेखात म्हटले आहे की, अण्णांनी रामलीला मैदानावरील त्यांचे आंदोलन मागे घेतले असले तरी त्यातून साध्य काय झालं असा प्रश्न उपस्थित केला आहे. पूर्वीसारखा जोर त्यांच्या आंदोलनात आता दिसलाच नाही अशी बोचरी टीका अण्णांच्या आंदोलनावर करण्यात आली आहे.

अण्णांनी लोकपाल तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केले खरे पण अण्णांच्या आंदोलनातून नक्की साध्य काय झालं असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने सातव्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले म्हणजे नक्की काय झालं ? फडणवीसांनी अण्णांच्या विविध मागण्यांच पंतप्रधानांची सही असलेलं पत्र अण्णांना सुपूर्द केलं आणि अण्णांनी आंदोलनाची सांगता केली आणि बातमी आली की, केंद्र सरकारने सर्व मागण्या तत्वतः मान्य केल्या. आता तत्वतः म्हणजे नक्की काय ? पुन्हा अण्णा म्हणतात मागण्या सहा महिन्यात मान्य नाही झाल्या तर पुन्हां उपोषणाला बसेन. मुळात अण्णांच्या रामलीला मैदानावरील फलित काय ? तर फक्त अण्णांचं वजन सहा-सात किलोने घटले, पण आंदोलनातून काहीच हाती लागले नाही.

सरकारच्या तत्वतः आश्वासनांवर भरवसा ठेवायचा होता तर रामलीलावर कशाला, सरळ राळेगणसिद्धीतच आंदोलन करायला काहीच हरकत नव्हती. अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला याचे वाईट वाटते अशी बोचरी टीका अण्णांच्या आंदोलनावर सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Anna Hajare(18)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x