24 April 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
x

गैरसमजांत राहू नये, चीनची लष्करी ताकद भारताच्या कितीतरी पटीने अधिक - ग्लोबल टाईम्स

China and India Military, Global Times

बीजिंग, १७ जून : लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. चीन सीमेवर शहीद झालेल्या २० जवानांची नावे आज सैन्य जाहीर करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीनकडून सीमेच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही.

संभाषणातून कोणताही तोडगा निघालेला नाही. आता केवळ लडाखच नाही तर संपूर्ण एलएसीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे असं चीननं म्हटलं आहे. दरम्यान, भारतावरच फोडले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दोन्ही देशांदरम्यान वाढलेला तणाव हा भारतामुळेच झालेला आहे. भारतीय सैन्याचा घमेंडीपणा आणि दुस्साहसामुळे हे घडले आहे. सैन्यांमधील संघर्ष दोन्ही देशांसाठी योग्य नाहीय. आम्ही मोठ्या युद्धासाठी तयार असून त्याचा फायदाही आमच्याबाजुला आहे, असे म्हटले आहे.

ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये युद्धखोरीची भाषा केली आहे. सीमेरेषेवर भारतीय सेना इन्फ्रास्ट्रक्चर उभारत आहे. त्यांनी चीनच्या जागेतही काही बांधकाम केले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष होत आहे. कारण चीनचे सैन्य भारतीयांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताने दोन गैसमज करून घेत सीमेच्या मुद्द्यावर कडक भूमिका घेतली आहे. यामध्ये पहिला अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे चीन भारतासोबत वाईट संबंध ठेवू इच्छित नाहीय. यामुळे चीन भारताने उकसावल्यास त्याला उत्तर देण्याची इच्छा ठेवत नाही.

दुसरा गैरसमज असा की काही लोकांना वाटते की, भारताच्या सैन्याची ताकद चीनपेक्षा जास्त आहे. या गैरसमजांमुळेच भारताच्या विचारांना प्रभावित केले आहे. पण चीन आणि भारताच्या तकदीमध्ये खूप अंतर आहे, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

 

News English Summary: Another misconception is that some people think that India’s military strength is greater than China’s. It is these misconceptions that have influenced India’s thinking. But there is a huge gap between the destinies of China and India, the Global Times said.

News English Title: There is a huge gap between the destinies of China and India Military said Global Times said News Latest Updatges.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x