26 April 2024 4:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

भारतीय जवानांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले - राहुल गांधी

China India, Rahul Gandhi

नवी दिल्ली, १८ जून: चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने सध्या देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान, या घटनेवरून आला राजकारणही सुरू झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जवानांच्या मृत्यूवरून केंद्र सरकारला खरमरीत शब्दात जाब विचारला आहे. देशाच्या वीर जवानांना जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, अशी विचारणा त्यांनी केली आहे.

ट्विटरवर व्हिडीओ शेअर करून राहुल गांधी यांनी या घटनेवरून जाब विचारला आहे, ‘’बंधु भगिनींनो चीनने भारताच्या निशस्र सैनिकांची हत्या करून एक मोठा अपराध केला आहे. माझा प्रश्न आहे की, या वीरांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले, याला कोण जबाबदार आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी या दोघांनीही बुधवारी चित्रफीत प्रसिद्ध करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला. चीनने भारताचा भूप्रदेश ताब्यात घेतला कसा? २० भारतीय जवानांना प्राण का गमवावे लागले? गलवानमधील विद्यमान स्थिती काय आहे? अजूनही आपले जवान आणि लष्करी अधिकारी बेपत्ता आहेत का? नेमके किती जवान आणि अधिकारी जबर जखमी झाले आहेत? चीनने भारताच्या कुठल्या कुठल्या भूप्रदेशावर ताबा मिळवलेला आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती सोनिया गांधी यांनी चित्रफीत संदेशात केली असून गलवानमधील सत्य पंतप्रधानांनी देशाला सांगितले पाहिजे, असे आवाहनही केले.

१५ आणि १६ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात सैनिकी स्तरावरील चर्चा सुरू असताना भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापत झाली होती. या झटापटीमध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचे ४३ सैनिक ठार झाले होते. या घटनेनंतर भारत आणि चीनमधील तणाव कमालीचा वाढलेला आहे.

 

News English Summary: Rahul Gandhi has asked for an answer to this incident, “Brothers and sisters, China has committed a great crime by killing unarmed Indian soldiers. My question is, who sent these heroes in the direction of unarmed danger and why, who is responsible for this? This question has been asked by Rahul Gandhi.

News English Title: China has committed a great crime by killing unarmed Indian soldiers News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x