24 April 2024 7:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

सॅटेलाईट फोटो, लडाखची लोकं, आर्मीचे माजी जनरलही सांगतात चीनने आपला भूभाग बळकावला

Rahul Gandhi, PM Narendra Modi, Ladakha, India China

नवी दिल्ली 24 जून: भारत आणि चीन दरम्यानच्या सीमावादावर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी अजुन सुरूच आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा खोटेपणचा गंभीर आरोप केल आहे. चीनने भारताची एक इंचह जमीन घेतलेली नाही असं पंतप्रधान म्हणाले होते. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, लष्करचे माजी अधिकारी, सॅटेलाईटवरून घेतलेले फोटो, पत्रकार, असे सगळेच लोक चीनने एक नाही तर तीन ठिकाणी जमीन घेतली असं सांगत आहेत त्यामुळे पंतप्रधानांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे.

राहुल गांधी पुढे म्हणाले, चीनने जमीन घेतली असेल तर पंतप्रधानांनी जनतेला खरं सांगाव, त्यात घाबरण्यासारखं काहीही नाही. सगळा देश सरकारसोबत आहे असंही ते म्हणाले. त्याचबरोबर सीमेवर असणाऱ्या सैनिकांना शस्त्र का दिली नाहीत याचं उत्तरही सरकारने दिलं पहिजेत अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, लडाखच्या सीमेवर चीन छुप्या पद्धतीनं नवीन चाल खेळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही देशांमधील वाढत जाणारा तणाव कमी कऱण्यासाठी वारंवार बैठका होत असतानाच आता चीननं मंसूबे आखण्याची तयारीत आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर ‘प्रधानमंत्री जी, देश आपसे सच सुनना चाहता है।’ असा कॅप्शनसहीत एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या कॅप्शनमध्ये #SpeakUpForOurJawans हा हॅशटॅग वापरुन शहीद जवांनांसाठी मोदींनी बोललं पाहिजे असं सांगण्यात आलं आहे. “भारताच्या वीर शहीदांना माझे अभिवादन. संपूर्ण देश एकत्र येऊन, एकात्मतेने आपल्या भारतीय सेनेबरोबर आणि सरकारबरोबर उभा आहे. मात्र यामध्ये एक खूप महत्वाचा प्रश्न समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की भारताची एक इंच जमीनीही कोणी घेतलेली नाही. कोणीही भारताच्या हद्दीत आलं नाही. मात्र लोकं बोलतायत त्याप्रमाणे, उपग्रहांनी काढलेल्या फोटोंमध्ये दिसतयं, लडाखमधील जनता सांगतेय इतकचं काय लष्कारातील निवृत्त जनरलही सांगत आहेत की चीनने आपला भूभाग ताब्यात घेतला आहे. एका जागी नाही तर तीन जागी चीनने आपला भूभाग बळकावला आहे. पंतप्रधनजी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. पण देशाला खरं सांगावं लागेल. तुम्हा खरं बोलावं लागेल. जर तुम्ही म्हणालात की जमीन घेतली नाही आणि जमीन घेतली असेल तर चीनचा फायदा होईल. आपल्याला यांच्याविरोधात एकत्र लढायचं आहे. त्यांना बाहेर हकलवून लावायचं आहे. त्यामुळे न घाबरता तुम्ही बोलावं. जमीन घेतली असेल तर सांगा की हो चीनने जमीन घेतली आहे आणि आम्ही कारवाई करणार आहोत. संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे,” असं राहुल यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. तसेच व्हिडिओच्या शेवटी राहुल गांधींनी, “शेवटचा प्रश्न असा आहे की आपले हे जे शहीद सैनिक आहेत त्यांना हत्यारांशिवाय काय पाठवण्यात आलं आणि कोणी पाठवलं?,” असा प्रश्नही सरकारला विचारला आहे.

 

News English Summary: As local peoples of Ladakh say, satellite images show that people in Ladakh are saying that even retired army generals are saying that China has taken over its territory.

News English Title: MP Rahul Gandhi Says Pm Modi Should Accept If China Had Taken Indian Land We Will Fight Together News latest Updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x