29 March 2024 5:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

भाजपच्या १०५ पैकी काही आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात - यशोमती ठाकूर

Congress, Minister Yashomati Thakur, BJP MLA, MahaVikas Aghadi

मुंबई, १७ जुलै: राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादळ सर्वत्र चर्च आहे. त्यात महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र सरकार स्थिर असल्याचं त्यांनी म्हटलं असून उलटपक्षी भाजपचे १०५ पैकी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप येईल असा गौप्यस्फोट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. आमचे कोणी फुटणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सध्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने विचारलं जात आहे की महाराष्ट्रात काय होईल? मात्र मला सर्वांना सांगायचं आहे की राज्यातलं सरकार स्थिर आहे. कुणी हे स्थिर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. “जर कोणी सरकार अस्थिर करण्याचा किंवा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला चांगलं बडवू. आम्ही गांधीवादी आहोत पण दादागिरी किती दिवस सहन करायची. नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. तुमची गाठ आमच्ययाशी आहे लक्षात ठेवा,” असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

यापूर्वीही महाआघाडीचे सरकारच्या नेत्यांनी राजस्थान राजकीय परिस्थिती बिघडली असली तरी महाराष्ट्रातील सरकार हे स्थिर असल्याचं वक्तव्य केलं होतं. कल भाजप नेते नारायण राणे यांनी सामना वृत्तपत्रातून पूर्वी शरद पवारांविरोधात आलेल्या बातम्यांचा उल्लेख केला होता. तर त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. संजय राऊत हे नोकरी जरी सामनात करीत असले तरी ते काम शरद पवारांचं करतात असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

 

News English Summary: BJP MLAs are in touch with us and if their names are known, there will be an earthquake in the state, said Maharashtra Pradesh Congress Committee Executive President and Women and Child Welfare Minister Yashomati Thakur.

News English Title: Congress Yashomati Thakur Bjp MLA Maharashtra Government News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x