25 April 2024 2:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

सुशांत प्रकरण | त्यांनी मला क्वारंटाईन नाही तर चौकशीच क्वारंटाईन केली

Sushant Singh Rajput Case, Bihar Police, Patna SP Vinay Tiwari, Quarantine

मुंबई, ७ ऑगस्ट : सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस अधिकारी पटण्यासाठी रवाना झाले आहेत. मला क्वारंटाईन केल्यामुळे चौकशीत अडथळा आल्याचा आरोप विनय तिवारी यांनी केला आहे. पटण्याला परतत असताना विनय तिवारी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

‘त्यांनी मला क्वारंटाईन केलं असं मी म्हणणार नाही, तर त्यांनी चौकशीच क्वारंटाईन केली. बिहार पोलिसांच्या चौकशीमध्ये अडथळे आणले गेले,’ असा आरोप विनय तिवारी यांनी केला आहे. कोणतीही यंत्रणा एकत्र काम करत असते. आपल्याला एकत्र काम करणं गरजेचं आहे असं सांगताना सीबीआय तपास करत असल्याने सुशांत सिंह प्रकरणावर आता भाष्य करणं योग्य ठरणार नाही असंही यावेळी ते म्हणाले.

दरम्यान सीबीआयने तपास हाती घेतल्यानंतर बिहारमधून आलेले पोलीस अधिकारी गुरुवारी पुन्हा राज्यात रवाना झाले. क्वारंटाइन असल्याने विनय तिवारी मुंबईतच होते. बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी विनय तिवारी यांना क्वारंटाइन करण्यावरुन टीका करताना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता.

त्यांना क्वारंटाईन केल्यानंतर पालिका आयुक्तांना बिहार पोलीस अधिकाऱ्यांनी पत्र लिहून विनय तिवारी यांची सुटका कारण्यासाठी विनंती केली होती. तसेच याबाबत कायदेशीर मार्गाने पुढचं पाऊल उचलू असं देखील त्यांनी म्हटलं होतं. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस बिहार पोलिसांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने ही शिफारस मान्य करत सीबीआयकडे तपास देण्यास मान्यता दिली. यानंतर सीबीआयने सुद्धा तपास हाती घेत ६ ऑगस्ट २०२० रोजी एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

News English Summary: Bihar police officers who had come to Mumbai to investigate the death of Sushant Singh Rajput have left for Patna. Vinay Tiwari has alleged that quarantining me hampered the investigation.

News English Title: Sushant Singh Death Case Bihar Patna SP Vinay Tiwari Release From Quarantine News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x