26 April 2024 12:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

बळीराजा दुर्लक्षितच | गेल्या ६ महिन्यांत राज्यात रोज ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Farmer suicide, Maharashtra, CM Uddhav Thackeray

मुंबई, ७ ऑगस्ट : करोनाच्या संकटाने राज्याचं कंबरडं मोडलेलं असतानाच आता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या सत्रामुळे राज्य सरकारसमोर मोठं आवाहन उभं राहिलं आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात १ हजार ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जानेवारी ते जून या महिन्यात सरासरी दररोज सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.

कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक बसला आहे. खासकरून फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे फळे आणि भाजीपाला शहरातील मार्केटमध्ये पोहोचू शकले नाही. परिणामी संपूर्ण मालाची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

जानेवारी ते जून दरम्यान झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये जूनमध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये मालांची वाहतूक थांबली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे भावही कोसळले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं होतं. दरम्यान, गेल्या वर्षाच्या तुलनेत लॉकडाऊनमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या कमी आहे. गेल्या वर्षी २०१९मध्ये या सहा महिन्यांत १३३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. गेल्या वर्षी मराठवाड्यात प्रचंड पाऊस झाला होता. तर पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पिके नष्ट झाली होती.

दुसरीकडे फडणवीस सरकारच्या काळातील आणखी एक निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. बळीराजा चेतना अभियान योजना बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी फडणवीस सरकारने ही योजना सुरु केली होती. विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू होती.

शेतकरी आत्महत्या रोखण्यात योजना अयशस्वी ठरल्याने आघाडी सरकारने योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये फडणवीस सरकारने बळीराजा चेतना अभियान योजना तयार केली होती. राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यात ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यास सुरुवातही झाली होती.

 

News English Summary: Due to the farmers’ suicide session, there is a big appeal before the state government. In the last six months, 1,074 farmers have committed suicide in the state and an average of six farmers have committed suicide every day from January to June.

News English Title: Farmer suicide 1074 farmers ended lives in Maharashtra in 6 months News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x