20 April 2024 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

मोदींनी २ कोटी रोजगाराची स्वप्नं दाखवून, १४ कोटी तरुणांना बेरोजगार केलं - राहुल गांधी

Modi Government, Rahul Gandhi, Unemployment, Job Loss, Youth Congress

नवी दिल्ली, ०९ ऑगस्ट : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. राहुल गांधींनी आता बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला आहे. 9 ऑगस्ट रोजी युवा कॉंग्रेस स्थापना दिनानिमित्त राहुल गांधी यांनी बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. ट्विटरवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणाले, ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी देशातील तरुणांना वचन दिले होते की, 2 कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून मिळेल. प्रत्येक वर्षी एक मोठे स्वप्न दाखवले. पण अखेर सत्य बाहेर आलेच. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळेच 14 कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.

राहुल गांधी म्हणतात, हे का झालं, तर चुकीच्या धोरणांमुळेच झाले. नोटाबंदी, चुकीचा जीएसटी आणि नंतर लॉकडाऊन केलं. या तिन्ही घटकांनी भारताची रचना, आर्थिक संरचना नष्ट केली. आता सत्य हे आहे की, भारत यापुढे मोदी सरकार तरुणांना रोजगार देऊ शकत नाही. म्हणूनच युवक कॉंग्रेस मैदानात उतरत आहे.

राहुल गांधी म्हणाले की, युवक कॉंग्रेस प्रत्येक शहरात, प्रत्येक रस्त्यावर हा मुद्दा उपस्थित करणार आहे, याचा मला आनंद आहे. युवक कॉंग्रेस बेरोजगारीचा मुद्दा लावून धरणार आहे. राहुल गांधींनी लोकांना आवाहन केले आहे की, तुम्ही सर्वांनी ‘रोजगार दो’ मोहिमेमध्ये सामील व्हा आणि देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी युवक कॉंग्रेसबरोबर काम करावे.

दरम्यान, चीनकडून कथित सीमा उल्लंघन प्रकरणाचं वादळ काही काळ शांत झालेलं असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं की, “आपल्याला आता खोटेपणाचा कचरा देखील देशातून साफ करायला हवा.”

पीएमओनं नुकतचं ट्विट करुन कचरामुक्त भारत मिशनमध्ये सामिल होण्याचे आवाहन जनतेला केले होते. या ट्विटवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, “का नाही? आपल्याला आणखी एक पाऊल पुढे टाकून देशातील खोटेपणाचा कचरा देखील साफ करायला हवा. यासाठी पंतप्रधान आता चीनने आपल्या जमिनीवर कब्ज केलाय की नाही ते सांगून हा सत्याग्रह सुरु करतील का?”

 

News English Summary: When Narendra Modi became the Prime Minister, he had promised the youth of the country that 2 crore youth would get employment. Every year showed a big dream. But in the end, the truth came out. Rahul Gandhi has also alleged that 14 crore youth have become unemployed due to Narendra Modi’s policies.

News English Title: Rahul Gandhi unemployment Modi government youth congress economic crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x