20 April 2024 9:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

कुरुक्षेत्र येथील शेतकऱ्यांच्या मोर्चावरील लाठी हल्ला भोवणार | जेजेपी भाजपवर नाराज

Pressure JJP, leave from NDA, Hariyana Government, Akali Dal, Marathi News ABP Maza

कुरुक्षेत्र, १८ सप्टेंबर : १० सप्टेंबररोजी, कुरुक्षेत्र जिल्ह्यातील शेतकरी कृषी विधेयकाविरोधात मोर्चासाठी रस्त्यावर उतरले. यानंतर पोलिसांनी त्यांना रोखत त्यांच्यावर लाठीचार्ज केला. पोलिसांच्या कारवाईत बरेच शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचा आरोप करत सरकारवर हल्ला चढविला. हरियाणात जेजेपी भाजपासोबत सत्तेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. त्यामुळे जेजेपी आमदारांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता वाटू लागली आहे. त्यात हरसिमरत यांनी आपली खुर्ची सोडल्याने दुष्यंत चौटाला यांच्यावरील दबाव वाढला आहे.

शिरोमणी अकाली दल केंद्रातून बाहेर पडल्यानंतर आता हरियाणामध्ये भाजपचा सहकारी पक्ष जननायक जनता पार्टी (जेजेपी) वर दबाव वाढत चालला आहे. शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे जेजेपीचे प्रमुख उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला सध्या गोंधळात अडकले आहेत. हरियाणामध्ये भाजपा-जेजेपी युतीचे सरकार आहे. हरियाणाचे शेतकरी कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेत. प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या पंचायती होत असून या विधेयकाविरोधात त्यांचा रोष सतत वाढत आहे.

शेतकर्‍यांची नाराजी पाहून जेजेपीच्या आमदारांमध्ये बंडखोरीची ठिणगी पडली आहे. जेजेपीचे आमदार रामकुमार गौतम यापूर्वीच उपमुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य करत होते आणि आता टोहानाचे आमदार देवेंद्रसिंग बबली यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दुष्यंत चौटाला यांच्या विरोधात थेट मोर्चा उघडला आहे.

दरम्यान, टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांना कांदा सलग पाच ते सहा महिने ५०० ते ८०० रुपये क्विंटल दराने म्हणजे उत्पादन खर्चापेक्षा निम्म्या दराने विकावा लागला होता. तेव्हा सरकारने कांद्याचे दर वाढण्यासाठी कोणती हालचाल केली नाही. परंतु, आता कांद्यावर दोन तासात निर्यात बंदी केली आहे. म्हणजे निर्यात बंदी करताना दोन तास आणि निर्यातबंदी हटविताना १५-१५ दिवस मुदत द्यायची, हा सरकारचा दुटप्पीपणा असल्याकडे संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लक्ष वेधले. कांदा उत्पादनात जगात भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

 

News English Summary: With the exit of the Shiromani Akali Dal from the Center, pressure is mounting on the BJP’s ally Jananayak Janata Party (JJP) in Haryana. JJP chief deputy chief minister Dushyant Chautala is currently embroiled in controversy over farmers’ grievances. Haryana has a BJP-JJP coalition government. Haryana farmers are protesting against the Agriculture Bill.

News English Title: Pressure on JJP to leave from BJP Government in Hariyana after Akali Dal over farmers Issue Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#NDA(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x