19 April 2024 6:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

चहाच्या टपरीवरच मोदींच्या पराभवाची चर्चा होईल: राजू शेट्टी

देऊळगाव : नरेंद्र मोदींनी ज्या चहाच भांडवल केलं आणि सामान्य जनतेची फसवणूक केली, तीच जनता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परभाव का झाला? याची चर्चा चहाच्याच टपरीवर करताना दिसतील असं भाकीत राजू शेट्टी यांनी देऊळगाव येथे केलं.

शेतकर्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशन बोलावण्याची आमची मागणी मान्य करावी अस आवाहन करत, २०१९ मधील निवडणूक धर्माच्या आणि जातीच्या नावावर लढणाऱ्या आणि स्वत:ला गांधीवादी व लोकशाहीचे पुजारी म्हणवणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिसका दाखवा असं खुलं आवाहन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी देऊळगाव येथे उपस्थितांना संबोधित करताना केलं.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेची महाराष्ट्र दिनापासून धुळे जिल्ह्यातील ‘वखरण’ येथून ‘शेतकरी सन्मान यात्रा’ सुरू झाली होती आणि ५ मे रोजी रात्री ती देऊळगाव मही येथे पोहोचली होती त्यावेळी राजू शेट्टी उपस्थितांना संबोधित करत होते. ही लढाई नेतृत्व स्थापन करण्यासाठी नसून परिवर्तन करण्यासाठी आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आली असून सरकारचे आयात संदर्भातील धोरण हे शेतकऱ्यांसाठी अतिशय मारक ठरत आहे. तसेच केंद्र सरकारने जर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस स्वकारल्या असत्या तर वेतन आयोगाप्रमाणे सरकारला फरक द्यावा लागला असता. आधीच नोटबंदी व जीएसटीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे असं ही राजू शेट्टी म्हणाले.

देऊळगाव मही येथे ‘शेतकरी सन्मान यात्रेला’ माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगूले, कवी ज्ञानेश वाकुडकर, महिला प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, राज्य उपाध्यक्ष सयाजी मोरे, अमोल हिप्परगे, अनिल पवार, राज्य उपाध्यक्षा शर्मीला येवले, बबनराव चेके, घनशाम चौधरी, माणिकराव कदम, गजानन बंगाळे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x