24 April 2024 9:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

फडणवीसांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या | NCRB डेटा

Agriculture Crisis, Farmers Suicides, Highest In Maharashtra, NCRB report

मुंबई, ११ ऑक्टोबर : भाजपा सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतरही महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचं थांबले नसल्याची स्थिती आहे. एनसीबीआरनं वर्ष २०१९मधील देशातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली असून, या आकडेवारीनं महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकली आहे. देशातील शेतकरी आत्महत्यांच्या क्रमवारीत दुर्वैवानं महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. देशात २०१९ या वर्षात दहा हजार २८१ शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.

कृषी सुधारणांसह कर्जमाफी करत दिलासा दिल्यानंतरही महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचं सत्र कायम आहे. काळजीची बाब म्हणजे देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. २०१९ या वर्षातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी एनसीआरबीनं जाहीर केली असून, त्यात देशात दहा हजार २८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचं म्हटलं आहे. यात एकट्या महाराष्ट्रात तीन हजार ९२७ म्हणजे जवळपास चार हजार शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळलं आहे.

“कृषी सुधारणांना चालना देण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. २००६ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात राज्यात कंत्राटी शेतीसह इतर शेतीविषयक सुधारणांची अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु राज्यातील १.५६ कोटी शेतकऱ्यांपैकी ५० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कंत्राटी शेतीचा लाभ घेतलेला नाही,” असं कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. “यानंतर सत्तेत आलेल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारनंही गट शेतीवर भर दिला. आर्थिक प्रोत्साहन १ कोटी रूपयांपर्यंत वाढवलं,” असंही अधिकाऱ्यांनं सांगितलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपानं ८९ लाख शेतकऱ्यांसाठी ३५ हजार कोटींची कर्जमाफी केली होती.

या कर्जमाफीनंतरही राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी झाल्या नसल्याचं एनसीआरबीची आकडेवारी सांगते. राज्यात २०१४, २०१५, २०१६ आणि २०१९मध्ये ३ हजार ५०० पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे. २०१७ व २०१८ या वर्षातील शेतकरी आत्महत्यांची एनसीआरबीनं नोंद केलेली नाही.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील महिलांवरील गुन्ह्यांबाबत नुकताच एक अहवाल नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (NCRB) जाहीर केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात महिलांसह सलग तीन वर्षांत सर्वाधिक सायबर स्टॉकिंग / धमकावण्याच्या घटनांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, २०१७ ते २०१९ या काळात महाराष्ट्रात २०५१ सायबरस्टॉकिंग / धमकावण्याचे प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जी संपूर्ण देशभरात नोंदविलेल्या एकूण घटनांपैकी एक तृतीयांश आहे. आंध्र प्रदेश १८४ प्रकरणांसह दुसर्‍या आणि हरियाणा ९७ प्रकरणे, म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर आहे.

२०१९ मध्ये महिलांविरुद्ध झालेल्या सायबर गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, देशात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे. २०१९ मध्ये झालेल्या सायबर गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, देशात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटकमध्ये ५० टक्के गुन्ह्यांत वाढ होत २,६९८ इतके गुन्हे २०१९ मध्ये नोंदवले गेले आहेत. तर महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात २०१९ मध्ये १,५०३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. राज्यात २०१८ साली १२६२ गुन्ह्यांची नोंद झाली होती. म्हणजेच २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये राज्यातील या गुन्ह्यांच्या संख्येत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

News English Summary: Maharashtra ranks first in the country in terms of farmer suicides. According to statistics, 10,281 farmers lost their lives in the country in the year 2019. The BJP, led by former chief minister Devendra Fadnavis, had written off Rs 35,000 crore for 89 lakh farmers. According to NCRB figures, farmer suicides in the state have not decreased even after the waiver. Statistics show that more than 3,500 farmers committed suicide in the state in 2014, 2015, 2016 and 2019. NCRB has not registered farmer suicides in 2017 and 2018.

News English Title: Agriculture Crisis Farmers Suicides Highest In Maharashtra says NCRB report Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x