20 April 2024 8:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे आतापर्यंत ४८ जणांचा मृत्यू

Heavy Rain, 48 Dead, Maharashtra, crops damaged

पुणे, १७ ऑक्टोबर : राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि कोकण या तीन विभागांना गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे आतापर्यंत ४८ जणांना प्राणास मुकावे लागले आहे तर लाखो हेक्टवरील हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली आहेत. शेतकऱ्यावर झालेला हा मोठा आघात असून शासनाच्या मदतीकडे सारेच आस लावून बसले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिन्ही विभागांतील स्थितीचा आढावा घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. पश्चिम महाराष्टारातील २८ जण तर मराठवाड्यातील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवड्यातील शेतीचे सगळ्यात जास्त नुकसान मराठवाड्यातील ४ लाख ९९ हजार ६४८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात राज्यातली ५७ हजार ३५४ हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे. मुसळधार पाऊस आणि विविध नद्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका हा सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या शहरांना बसला आहे.

पुणे जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. बागायती शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलाय. पुणे जिल्ह्यातल्या बागायती पट्यातलं नुकसान कोट्यवधीच्या घरात आहे. वाहून गेलेले कांदा. सडलेला बटाटा, टोमॅटोचा झालेला लाल चिखल आणि भुईसपाट झालेला ऊस. सुजलाम सुफलाम असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर परिसरातील प्रत्येक शेतात कमी अधिक फरकानं हेच चित्रं दिसत आहे. परतीच्या पावसाने शेकडो हेक्टर जमिनीवरच्या पिकं मातीमोल केली आहेत.

 

News English Summary: Pune, Aurangabad and Konkan divisions of the state have been hit hard by the return rains for the last three days. Extreme levels of rainfall and floods have so far claimed the lives of 48 people and destroyed millions of hectares of crops. This is a big blow to the farmers and they are waiting for the help of the government. Meanwhile, Chief Minister Uddhav Thackeray has reviewed the situation in the three divisions and Prime Minister Narendra Modi has also approached the Chief Minister and assured him of full cooperation.

News English Title: Rains claim 48 lives in Maharashtra crops damaged extensively News updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x