माध्यम स्वातंत्र्यावरील आघाताला ४ वर्ष पूर्ण | मोदी सरकारने NDTV Blackout चा निर्णय घेतला होता
नवी दिल्ली, ०५, नोव्हेंबर: काल महाराष्ट्रात अर्णब गोस्वामीला त्याच्या व्यावसायिक कारणातील कुरापतीमुळे म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वास्तविक याचा पत्रकारितेवरील हल्ल्याशी कोणताही संबंध नाही. संपूर्ण विषय अन्वय नाईक कुटुंबीय आणि अर्णब गोस्वामीच्या मालकीच्या रिपब्लिक टीव्ही दरम्यानचा आहे. मात्र भाजपकडून पत्रकारितेवरील हल्ल्याची बोब सुरु असून त्याचा थेट आणीबाणीशी संबंध जोडला जात आहे.
वास्तविक दुसरी खरी आणीबाणी २०१६ मध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशाने आणि पत्रकारांनी अनुभवली होती. मोदी सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीवर घातलेल्या एक दिवसाच्या बंदीच्या निर्णयाला याच महिन्यात ४ वर्ष पूर्ण होतं आहेत. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याची संवेदनशील माहिती प्रसारित केल्याचा ठपका ठेवत मोदी सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका समितीने ९ नोव्हेंबर रोजी एनडीटीव्हीचे प्रसारण एका दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या माहितीचा उपयोग दहशतवाद्यांचे हँडलर्स करू शकले असते, असंही त्यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं होतं.
मात्र विषय सर्वोच्च न्यायालयात जाताच मोदी सरकार बिथरलं आणि अखेर बॅकफूटवर येत तात्पुरती स्थगिती दिली होती. तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांनी ती घोषणा केली होती. एनडीटीव्हीनं त्या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून दाद मागितली होती. त्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार इतक्यात अचानक माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही बंदी उठवल्यानं केंद्र सरकारचा हेतू समोर आला होता. तो माध्यमांना घाबरविण्याचा एक प्रयत्न तर नव्हता ना असा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता.
#FLASH: I&B Ministry sources say ministry reviewing NDTV India November 9 blackout case, put on hold for now.
— ANI (@ANI) November 7, 2016
त्यावेळी एनडीटीव्हीवरील एका दिवसाच्या बंदीचा सर्वत्र निषेध होत असतानाच हा प्रकार म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावर आघात आहे, अशी टीका सर्वस्तरांतून होत होती. या सर्व पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या बंदीला स्थगिती दिल्याने मोदी सरकार तोंडघशी पडले होते.
News English Summary: Arnab Goswami was arrested in Maharashtra yesterday in connection with Naik’s suicide case. In fact, it has nothing to do with the attack on journalism. The whole subject matter is between the Naik family and Republic TV owned by Arnab Goswami. However, the BJP has launched an attack on journalism, which is being linked directly to the emergency.
News English Title: NDTV India blackout November 2016 Modi Government News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Praveg Share Price | मार्ग श्रीमंतीचा! प्रवेग कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, स्टॉक तेजीत यायेणार
- Dhani Share Price | 41 रुपयाच्या शेअरने 2 दिवसात 22 टक्के परतावा दिला, स्टॉक रोज अप्पर सर्किट हीट करतोय
- Reliance Power Share Price | 26 रुपयाच्या रिलायन्स पॉवर शेअर्सची खरेदी वाढली, कंपनीकडून सकारात्मक अपडेट वाढल्या
- JBM Auto Share Price | अल्पावधीत 1711% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
- Penny Stocks | चिल्लर प्राईस शेअर्समधून बंपर परतावा मिळवा! टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढवा
- Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, वेगाने परतावा मिळतोय
- RITES Share Price | राईट्स कंपनी शेअर्स ऑर्डर मिळताच तेजीत, अत्यंत फायद्याचा आहे हा शेअर
- Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत
- Nykaa Share Price | नायका शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, अल्पवधीत मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले पहा