20 April 2024 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

अर्णब गोस्वामींच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला राज्य सरकार जवाबदार असेल

BJP MP Narayan Rane, MahaVikas Aghadi government, Arnab Goswami, Taloja Jail

रायगड, ८ नोव्हेंबर: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत प्रत्येक दिवशी वाढ होताना दिसत आहे. कालच अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याने त्याची चिंता अजून वाढली आहे.

त्यानुसार अर्णब गोस्वामी यांची अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून आता तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी रायगड आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त टीमने त्यांच्या राहत्या घरातून सकाळी अटक केली होती. तिथून त्यांना थेट अलिबाग येथे नेण्यात आले होते. तिथे कोर्टात हजर केले असतान त्यांना १४ दिवसांची कोर्ट कस्टडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून अर्णब गोस्वामी यांना कोरोना अडचणीच्या अनुषंगाने अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले होते.

दरम्यान, यानंतर भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जवाबदार असेल असं म्हटलं.

अर्णब गोस्वामी यांचं प्रकरण हायकोर्टात असून देखील वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी चालवला आहे. महाराष्ट्र सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होत आहे. गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची संपूर्ण जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल,” असं म्हणत खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.

 

News English Summary: Accordingly, Arnab Goswami has been sent to the Taloja Jail from the Marathi School Upakaragriha in Alibag. Arnab Goswami, editor of Republic TV, was arrested by a joint team of Raigad and Mumbai police from his residence on November 4 in connection with the Naik suicide case. From there they were taken directly to Alibag. He was remanded in court custody for 14 days. Since then, Arnab Goswami was kept in the upakarigraha of a Marathi school in Alibag due to the Corona problem. Meanwhile, Bharatiya Janata Party (BJP) MP Narayan Rane attacked the Thackeray government, saying the entire state government would be held responsible if any threat was made to Arnab Goswami’s life.

News English Title: BJP MP Narayan Rane criticized MahaVikas Aghadi government over shifting Arnab Goswami to Taloja Jail News Updates.

हॅशटॅग्स

#NarayanRane(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x