23 April 2024 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
x

जलयुक्त शिवार योजनेत देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय - अमृता फडणवीस

Thackeray government, Jalyukta Shivar enquiry

मुंबई, ९ नोव्हेंबर: रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, हायकोर्टात देखील गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई हायकोर्टानं त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीला अलिबाग सत्र न्यायालयाने आज हिरवा कंदील दाखवला आहे आणि त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं असून, तिथेच दररोज तब्बल ३ तास चौकशी करण्याची परवानगी कोर्टाने पोलिसांना दिली आहे.

दरम्यान, आज ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या ‘माझी भिंत’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला अमृता फडणवीस उपस्थित होत्या. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार टीक केली. ‘राज्य सरकारनं शहाणं व्हावं. जनतेने त्यांना निवडून दिलेलं नाही. पण तरीही आता खुर्ची मिळाली आहे, तर नीट काम करावं.

पुढे त्या म्हणाल्या की, ‘कुणी काही बोलतंय त्यावर रिऍक्ट करून त्रास देणं बंद करावं,’ असं अमृता म्हणाल्या. जलयुक्त शिवारसारख्या योजनेतही देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मोठा माणूस मोठाच राहतो, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

 

News English Summary: Amruta Fadnavis strongly criticized the conduct of the MahaVikas Aghadi government. ‘The state government should be wise. The people did not elect him. But now that we have a chair, we have to work hard. She further said, “Stop harassing someone by reacting to what someone is saying,” said Amrita. Even in schemes like Jalayukta Shivar, attempts are being made to implicate Devendra Fadnavis, but a big man stays big, he said, targeting the Thackeray government.

News English Title: Amruta Fadnavis criticized Thackeray government over Jalyukta Shivar enquiry news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x