20 April 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला
x

गेंड्याचं कातडं पांघरलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाग यायला तयार नाही

Former minister Sadabhau Khot, MahaVikas Aghadi government

मुंबई, १७ नोव्हेंबर: राज्यातील तमाम ग्राहकांना भरमसाट वीज बिलावरून मोठा शॉक लागला आहे. कारण अनेक आंदोलनं होऊन देखील महाविकास आघाडी सरकारने सामान्य ग्राहकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत वीजबिल भरा असंच म्हटलं आहे. कारण ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीच याबाबत माहिती दिली आहे.

लोकांनी वीज वापरली त्याचे बील भरावे कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे आहेत. वाढीव वीज बिलातून सवलत देणे राज्य सरकारला परवडणारं नाही तसंच ते आर्थिंक दृष्ट्या अशक्य असल्याचं नितीन राऊत यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्याचाच पुनरुच्चार राऊत यांनी पुन्हा केला.

दरम्यान, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत (Rayat Kranti Sanghatana President and Former Minister Sadabhau Khot) यांनी राऊत यांच्यावर जोरदार शब्दांत प्रहार केला आहे.करोना संकटाच्या काळात शेतकरी आणि कामगारांचे कंबरडेच मोडले. गेले काही महिने अभूतपूर्व अशा आर्थिक संकटातून जात असलेल्या या वर्गाला १०० टक्के वीजबिलमाफी देऊन खरंतर आधार देण्याची गरज होती मात्र गेंड्याचं कातडं पांघरलेल्या राज्यातील महाविकास सरकारला जाग यायला तयार नाही, असे नमूद करत विरोधात असताना वीजबिल माफ करा, असे म्हणत शेतकरी व कामगारांबाबत कळवळा दाखवत होता मग आता सत्तेत आल्यावर काय झाले?, असा सवालच खोत यांनी केला.

महापूर आणि दुष्काळाच्या काळात तत्कालीन फडणवीस सरकारला विरोधकांनी धारेवर धरले होते. वीजबिलात सूट देण्यात यावी, शक्य झाल्यास वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी करत विरोधकांना टाहो फोडला होता. तेव्हा विरोधी बाकांवर असलेले आता सत्तेत आहेत आणि वापरलेल्या विजेचे बिल भरावेच लागेल, असे सांगू लागले आहेत. हे वागणे म्हणजे जनतेच्या मतांशी एकप्रकारची प्रतारणाच आहे, अशा शब्दांत खोत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी प्रसार माध्यमांकडे दिलेलं स्पष्टीकरण नेमकं काय आहे.
वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे. कोणाचे वीज कनेक्शन कट होणार नाही. योग्य बिल नसले तर त्याची तक्रार करावी मीटर पाहणी केली जाईल. राज्यात बिल सवलत याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली, पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तूर्तास मिळेल असे वाटत नाही, असं नितीन राऊत म्हणाले. महावितरणने २४ तास वीज उपलब्ध केली. लोकांनी वीज वापरली त्याची बिलं भरावी. वीज कंपनीने लॉक डाऊनमध्ये वीज पुरवठा केला. महावितरणवर ६९ हजार कोटी कर्ज आहे. आम्ही कर्ज काढून कामकाज करत आहोत अजून किती करणार? असा सवाल नितीन राऊत यांनी विचारला आहे. दरम्यान, महावितरणने वीजबिल वसुलीबाबत परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार डिसेंबर २०२० पर्यंत थकीत वीजबिले भरावी लागणार आहेत.

 

News English Summary: Sadabhau Khot, president of the Rayat Kranti Sanghatana and a former minister, has lashed out at Raut. This class, which has been going through an unprecedented financial crisis for the last few months, needed to be supported by 100 per cent electricity bill waiver, but the state government, which is covered in rhinoceros skin, is not ready to wake up, he said. What happened now that he came to power ?, Khot asked.

News English Title: Former minister Sadabhau Khot criticized MahaVikas Aghadi government news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x