25 April 2024 11:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक TV'च्या कर्मचाऱ्यांचा छळ | अर्णब पुन्हा हायकोर्टात

Republic TV editor Arnab Goswami, Mumbai Police, TRP scam case, Mumbai High Court

मुंबई, 08 डिसेंबर : रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक आणि सर्वेसेवा अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. कारण काल त्यांना थेट सुप्रीम कोर्टातून धक्का मिळाला आहे. केवळ अर्णब गोस्वामीच नव्हे तर त्यांच्या कर्मचाऱ्यांचे देखील धाबे दणाणले असतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

कारण रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही. सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीविरोधातील सर्व FIR रद्द करणे आणि तपास CBI ‘कडे वर्ग करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास काल स्पष्ट नकार दिला होता. सदर याचिका स्वभावत: महत्वाकांक्षी असल्याचे दिसत असल्याचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हटल्याने ती अर्णब गोस्वामी यांना चपराक असल्याचं देखील म्हटलं गेलं.

विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी रिपब्लिकच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करू नये आणि हे प्रकरण CBI’कडे हस्तांतरित करावे अशी आपली मागणी होती. परंतु ही याचिका मागे घेणेच योग्य असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. त्यानंतर याचिकाकर्त्याने ही याचिका मागे घेतली आहे.

त्यानंतर टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली (Arnab Goswami, editor-in-chief of Republic TV, has moved the Mumbai High Court in the TRP scam case) आहे. मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याचा आरोप करत अर्णब यांनी संपूर्ण तपास आणि कायदेशीर कार्यवाहीला स्थगिती द्यावी, अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे.

वाहिन्यांचे रेटिंग वाढवण्याच्या उद्देशाने काहींनी हंसा रिसर्च ग्रुपच्या माजी कर्मचाऱ्यांशी संगनमत करून घोटाळा केला, असा आरोप (Some conspired with former Hansa Research Group employees to raise the ratings of the channels) आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एआरजी आऊटलायर कंपनीच्या रिपब्लिक टीव्हीचाही घोटाळ्यात सहभाग असल्याच्या संशयावरून मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. परंतु, या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांचा जाणीवपूर्वक छळ केला जात असल्याचा आरोप, अर्णब गोस्वामी यांनी विनंती अर्जात केला आहे. एआरजी आऊटलायर ग्रुप आणि स्वतःच्या नावाने आधीच्या प्रलंबित याचिकेत अर्ज दाखल केला आहे.

रिपब्लिक टीव्हीचे पश्चिम विभाग वितरण प्रमुख घनश्याम सिंग यांचा २६ दिवसांच्या कोठडीत प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला. सिंग यांना पट्ट्याने मारलं तसेच कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांना सातत्याने चौकशीसाठी बोलवून छळवणूक केली, असे गंभीर आरोप या अर्जात केले आहेत. तसंच, ‘मुंबई पोलिस आमच्याविरोधात कुहेतूने ही चौकशी करत असल्याने ती स्थगिती करावी आणि तपास सीबीआयकडे सोपवावा’, असंही या अर्जात नमूद केलं आहे.

 

News English Summary: Arnab Goswami, editor-in-chief of Republic TV, has since moved the Mumbai High Court in the TRP scam case. Arnab has asked the Mumbai High Court to suspend the entire probe and legal proceedings, alleging harassment of Republic TV employees by the Mumbai police.

News English Title: Republic TV editor Arnab Goswami seeks stay against probe by Mumbai Police in TRP scam case News updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x